एक्स्प्लोर

Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा

Randhir Singh Passes Away : भारतीय नेमबाजी विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनुभवी शूटर आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले.

Randhir Singh Passes Away : भारतीय नेमबाजी विश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनुभवी शूटर आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. रणधीर सिंग हे ऑलिम्पिक स्तरावरील ट्रॅप आणि स्कीट शूटर होते. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 1978 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे पहिले नेमबाज ठरले होते.

त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना 1979  मध्ये अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. हा भारतातील खेळाडूंना दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.

त्यांच्या निधनाची माहिती भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनाचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “अत्यंत दुःखाने आम्ही राजा रणधीर सिंह यांच्या निधनाची बातमी देत आहोत. 27 मे 2026 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” 

खेळाडू म्हणून नाव कमावल्यानंतर रणधीर सिंग यांनी क्रीडा प्रशासनातही मोठी छाप सोडली. सप्टेंबर 2024 पासून ते आशिया ऑलिम्पिक परिषद (OCA) चे अध्यक्ष होते. यापूर्वी 2021  पासून त्यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Press Trust of India (PTI) (@ptinews_multimedia)

तसेच 2001 ते 2014 दरम्यान ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चे सदस्य होते, तर 2014 नंतर त्यांना मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. 1991 ते 2015 या काळात त्यांनी OCA चे महासचिव म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली.

देशांतर्गत क्रीडा व्यवस्थापनातही त्यांचे योगदान मोठे होते. 1987 ते 2012 या कालावधीत ते भारतीय ऑलिम्पिक संघटनाचे महासचिव होते. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गव्हर्निंग बोर्डावरही त्यांनी दीर्घकाळ काम केले.

दिल्लीमध्ये 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन भारताला मिळवून देण्यात रणधीर सिंह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्या स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते उपाध्यक्षही होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक मोठे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याने संपूर्ण क्रीडाविश्व हळहळ व्यक्त करत आहे.

हे ही वाचा -

SRH vs RR Eliminator IPL 2026 : एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget