एक्स्प्लोर

दोन वेळा विश्वविजेतेपद, एकदा ऑस्ट्रेलियाकडून स्वप्न भंगलं, तिसऱ्यांदा टीम इंडिया चषक उंचावणार?

Team India World Cup 2023 : वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Team India World Cup 2023 : वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.  यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.  चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारतायी संघ तिसऱ्या विश्वचषक उंचवणार का? याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

विश्वचषकातील भारताचा प्रवास -

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत इतिहास रचला होता. त्यानंतर 2003 मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2011 च्या फायनलमध्ये पोहोचून जेतेपद पटकावले. आता भारत पुन्हा चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये भारतीय संघ फायनलमध्ये खेळणार आहे.

1983 मध्ये पहिल्या जेतेपदावर कोरले नाव -

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त 183 धावा केल्या होत्या. त्यावेळी के श्रीकांतने 57 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला होता. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांत ऑलआऊट झाला.  भारताकडून मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. बलविंदर संधूने 2 आणि कपिल देवने 1 विकेट घेतली होती. 

2003 मध्ये स्वप्न भंगलं -

2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 359 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 234 धावांपर्यंत मजल मारता आली.  फायनलमध्ये भारताला 125 धावांनी पराभव झाला अन् कोट्यवधी चाहत्यांचे स्वप्न भंगलं. फायनलमध्येरिकी पाँटिंगने 140 धावांची शानदार खेळी केली.भारताकडून वीरेंद्र सेहवागने 82 धावांची एकाकी झुंज दिली होती.

लंकादहन करत दुसऱ्यांदा चषक उंचावला -

2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत इतिहास रचला होता. वानखेडेवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 गडी गमावून 274 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल भारताने चार विकेट्स गमावून विजय मिळवला होता. भारताकडून गौतम गंभीरने 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या. झहीर खान आणि युवराज सिंगने यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंहला एक विकेट मिळाली होती.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
Vaibhav Sooryavanshi : 6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
SL vs IND 1st Test : 4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Vaibhav Sooryavanshi News : भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget