एक्स्प्लोर

भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर.. 250 मिनिटाचा आयसीसीचा नियम काय सांगतो?

IND vs ENG Semifinal : टी20 विश्वचषकातल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गयानातल्या या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20  विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल.

IND vs ENG Semifinal : टी20 विश्वचषकातल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गयानातल्या या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20  विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. 2022 सालच्या टी20  विश्वचषकातही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. अॅडलेडमधल्या त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे सामना रद्द होऊ शकतो, अथवा व्यत्यय येण्याचीही दाट शक्यता आहे. पण आयसीसीने उपांत्य सामन्यासाठी राखीव वेळ ठेवला आहे. 250 मिनिटांचा राखीव वेळ ठेवलाय, पण तो नियम नेमका आहे तरी काय ? 

टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना गयानामध्ये होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गयानामध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. दोन दिवसांपासून गयानामध्ये संततधार सुरुच आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरु होण्यास उशीर होऊ शकतो. आयसीसीने दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवला नाही. पण सामना संपवण्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवलाय. पण हा 250 मिनिटांचा नियम नेमका आहे तरी काय? भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावेळी याचा वापर कसा होणार?  

250 मिनिटांचा नियम नेमका काय आहे?

टी20 विश्वचषकाचा थरार सुरु होण्याआधीच आयसीसीने उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस न ठेवता 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला होता. म्हणजेच, पाऊस अथवा इतर कोणत्या कारणामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला तर 250 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेचा वापर कऱण्यात येईल. म्हणजेच, भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात 250 मिनिटं म्हणजेच जवळपास 4 तास अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. या भारतीय वेळानुसार रात्री 1.10 वाजेपर्यंत सामना खेळवण्याबाबत पंच निर्णय घेऊ शकतात.  तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये षटकं कमी करण्यात येणार नाही. जर षटकांची संख्या कमी करण्याची वेळ आलीच तर उपांत्य सामना कमीत कमी 10 षटकांचा होऊ शकतो, असेही यामध्ये सांगण्यात आलेय. 

उपांत्य सामन्यात पावसाची शक्यता - 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गयानामध्ये होणार आहे. आज गयानामध्ये 90 टक्के पावसाची शक्यता आहे. सामना सुरु होण्याआधी दोन तास गयानामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सामना सुरु झाल्यानंतरही पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे, नियोजित वेळेत सामना सुरु झाला तरी व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. आयसीसीकडून 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. म्हणजे सामना झाला तर क्रिकेट चाहत्यांना सात ते आठ तास वाट पाहावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, नियोजित वेळेत सामना सुरु होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele Special Report :विश्वचषकावर भारताचं नाव, सुनंदन लेले यांच्या बार्बाडोसमधून खास रिपोर्टMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 30 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 June 2024 : 6 AM: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget