एक्स्प्लोर

Suryakumar Yadav PC: वर्ल्डकपच्या पराभवातून सावरण्यास वेळ लागेल - सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे.

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करेल. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे, त्याआधी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्यासाठी वेळ लागेल.
 
त्यायाशिवाय पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, या विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून उदाहरण दिले. या विश्वचषकात रोहित शर्माने जे काही केले ते पूर्णपणे वेगळे होते. त्याला जे सांगितले होते ते त्याने केले. संघाच्या बैठकीत जे काही बोलले गेले ते मैदानावर केले. कर्णधार या नात्याने त्याने उदाहरण देऊन नेतृत्व केले. विश्वचषकाबाबत सूर्या म्हणाला की, 2023 च्या विश्वचषकात आम्ही सर्वजण अभिमान वाटावे असे खेळलोत. 

भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आज जेव्हा मी खेळाडूंना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा आपण नि:स्वार्थपणे जावे. आपल्या विक्रमांसाठी खेळू नये. मी नेहमीच संघासाठी वैयक्तिक रेकॉर्डचा विचार करत नाही.

2021 पासून सूर्या भारताच्या टी20 संघाचा नववा कर्णधार -

2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आठ खेळाडूंनी भारताच्या टी20 संघाची धुरा संभाळली आहे. सूर्यकुमार यादव या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या सुरुवातीला विराट कोहलीने 10 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर 2021 मध्ये शिखर धवन 3 सामन्यात, 2021-22 मध्ये रोहित शर्मा 32 सामन्यात, 2022 मध्ये ऋषभ पंत 5 सामन्यात, 2022-23 मध्ये हार्दिक पंड्या 16 सामन्यात, 2022 मध्ये केएल राहुल 11 सामन्यात कर्णधार होता. 2023 मध्ये जसप्रीत बुमराह 2 सामन्यांसाठी भारतीय T20 संघाची जबाबदारी स्वीकारली.  2023 मध्ये 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा या यादीतील नववा भारतीय कर्णधार असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका - 

वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.

 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series 
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
Vaibhav Sooryavanshi India Debut : रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
Virat Kohli-Shubman Gill : शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
Gujarat Titans Bus Fire News : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ, कोण झाडीत तर कोण रोडवर...; 37 सेकंदाचा धडकी भरवणारा Video समोर
गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ, कोण झाडीत तर कोण रोडवर...; 37 सेकंदाचा धडकी भरवणारा Video समोर

व्हिडीओ

LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
Embed widget