एक्स्प्लोर

Suryakumar Yadav PC: वर्ल्डकपच्या पराभवातून सावरण्यास वेळ लागेल - सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे.

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करेल. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे, त्याआधी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्यासाठी वेळ लागेल.
 
त्यायाशिवाय पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, या विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून उदाहरण दिले. या विश्वचषकात रोहित शर्माने जे काही केले ते पूर्णपणे वेगळे होते. त्याला जे सांगितले होते ते त्याने केले. संघाच्या बैठकीत जे काही बोलले गेले ते मैदानावर केले. कर्णधार या नात्याने त्याने उदाहरण देऊन नेतृत्व केले. विश्वचषकाबाबत सूर्या म्हणाला की, 2023 च्या विश्वचषकात आम्ही सर्वजण अभिमान वाटावे असे खेळलोत. 

भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आज जेव्हा मी खेळाडूंना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा आपण नि:स्वार्थपणे जावे. आपल्या विक्रमांसाठी खेळू नये. मी नेहमीच संघासाठी वैयक्तिक रेकॉर्डचा विचार करत नाही.

2021 पासून सूर्या भारताच्या टी20 संघाचा नववा कर्णधार -

2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आठ खेळाडूंनी भारताच्या टी20 संघाची धुरा संभाळली आहे. सूर्यकुमार यादव या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या सुरुवातीला विराट कोहलीने 10 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर 2021 मध्ये शिखर धवन 3 सामन्यात, 2021-22 मध्ये रोहित शर्मा 32 सामन्यात, 2022 मध्ये ऋषभ पंत 5 सामन्यात, 2022-23 मध्ये हार्दिक पंड्या 16 सामन्यात, 2022 मध्ये केएल राहुल 11 सामन्यात कर्णधार होता. 2023 मध्ये जसप्रीत बुमराह 2 सामन्यांसाठी भारतीय T20 संघाची जबाबदारी स्वीकारली.  2023 मध्ये 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा या यादीतील नववा भारतीय कर्णधार असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका - 

वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.

 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series 
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget