एक्स्प्लोर

Team India Test Captaincy : पंत, बुमराह, राहुल नव्हे श्रेयस अय्यर होणार कसोटीत कर्णधार; कारण...

Team India Test Captaincy :  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (WTC Final) पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Team India Test Captaincy :  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (WTC Final) पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा सुरू असतानाच कर्णधार पदाच्या जबाबदारीसाठी धक्कादायक नाव समोर आले आहे. श्रेयस अय्यरकडे कसोटी संघाचे कर्णधार पद दिले जाऊ शकते. कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत श्रेयस अय्यर हा  केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. 

श्रेयस अय्यरला कसोटी खेळण्याचा फारसा अनुभव नाही, पण अनेक गोष्टी त्याच्या बाजूने जात असल्याने त्याचं पारडं जड दिसत आहे. अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. याशिवाय आयपीएलमध्ये अय्यरने कर्णधार म्हणूनही नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. 2020 मध्ये अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला होता. 

जसप्रीत बुमराहच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे अय्यरचा दावा अधिक मजबूत होत आहे. ऋषभ पंत कधी पुनरागमन करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. इतकेच नाही तर प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केल्यानंतर पंत पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दुसरीकडे केएल राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये भरपूर संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आहे. या कारणांमुळे निवडकर्ते केवळ नव्या चेहऱ्याचा विचार करण्याची शक्यताच जास्त दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माचे कर्णधारपद जाण्याची शक्यता -

या वर्षाच्या अखेरीपर्यंत रोहित शर्मा कसोटी संघाच्या कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा 36 वर्षांचा असून पुढील WTC फायनलपर्यंत खेळणे त्याला शक्य नाही. रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस हे दोन्ही गोष्टींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

असं असलं तरी पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहणार आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. त्या दौऱ्यात भारताला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.  श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. आशिया कपमध्ये अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्याला वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget