एक्स्प्लोर

BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!

Shreyas Iyer BCCI Ranji Trophy  : बीसीसीआयनं फटकारल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर यानं यु टर्न घेतला आहे.

Shreyas Iyer BCCI Ranji Trophy  : बीसीसीआयनं फटकारल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानं यु टर्न घेतला आहे. श्रेयस अय्यर आता रणजी स्पर्धेत (Ranji Trophy 2024) मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशननं (MCA) श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळणार असल्याची माहिती दिली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेत खराब फॉर्मनंतर श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला होता. पण अय्यरनं पाठदुखीचं कारण सांगत माघार घेतली होती. पण एनसीएकडून श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला फटकारलं होतं. पण आता त्यानं रणजी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. मुंबईच्या सेमीफायनल सामन्यासाठी अय्यर खेळताना दिसणार आहे. 2 मार्च ते 6 मार्च यादरम्यान मुंबई आणि तामिळनाडू यांच्यादरम्यान सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघात आता श्रेयस अय्यर खेळताना दिसणार आहे.

2 मार्च ते 6 मार्च यादरम्यान मुंबई आणि तामिळनाडू यांच्यामध्ये रणजी स्पर्धेचा उपांत्य सामना रंगणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं एमसीएच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार,  'श्रेयस अय्यर याने मुंबई क्रिकेट असोशिएशनला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं आणि उपांत्य सामन्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात अय्यर खेळताना दिसू शकतो.'

श्रेयस अय्यरच्या निर्णायामुळे झाला वाद - 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालं होतं. पण पहिल्या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. अय्यरला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. दोन कसोटीतील चार डावात अय्यर यानं  35, 13, 27 आणि 29 धावा केल्या होत्या. फ्लॉप कामगिरीनंतर अय्यरला ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला होता.  

आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना बीसीसीआयकडून करण्यात आलेली. पण अय्यरनं दुखापतीचं कारण सांगत रणजी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाला. जो खेळाडू नॅशनल ड्यूटीवर नाही, त्या प्रत्येकाला रणजी सामन्यात खेळावं लागेल, असा फतवा बीसीसीआयनं काढला. याला श्रेयस अय्यर यानं तिलांजली दिली. त्यानंतर बीसीसीआयनं फटकारलं. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा यानेही आपल्या शैलीत त्यांचा समाचार घेतला. बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरनं यू टर्न घेतला. आता त्यानं रणजी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. 

मुंबईचा संघ - 

अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकळ, मुशीर खान, प्रसाद पवार (विकेटकीपर), हार्दिक तोमोरे (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवन कुलकर्णी, रॉयस्टन डायस

आणखी वाचा :

धोनीचा हुकुमी एक्का पुन्हा चमकला, मराठमोळ्या खेळाडूने 11 व्या नंबरवर येऊन शतक ठोकलं!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav News : भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
भारताचा विजेता कर्णधार कायमचा OUT! सूर्यावर BCCIची मोठी कारवाई, कर्णधारपद गेले, संघातूनही बाहेर, अजित आगरकर काय म्हणाले?
India Squad for Asian Games 2026 : टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad
टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad
Team India T20I Squads : मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी; वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squads
BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी; वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squads

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget