एक्स्प्लोर

सॉरी सरफराज! रवींद्र जाडेजानं 'त्या' चुकीची जाहीर माफी मागितली!

Sarfaraz Khan : राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व मिळवलं. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांची जिगरबाज शतकं आणि पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचं अर्धशतक, हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं.

Ravindra Jadeja Apologising to Sarfaraz Khan : राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व मिळवलं. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांची जिगरबाज शतकं आणि पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचं अर्धशतक, हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. इंग्लंडविरोधात सरफराज खान यानं अर्धशतक ठोकलं. पण दुर्वैवीरित्या तो धावबाद झाला. रवींद्र जाडेजाच्या शतकाच्या नादात सरफराज खान धावबाद झाला. रवींद्र जाडेजा यानं सरफराज खान याला धावण्यासाठी कॉल दिला, पण नंतर मागे घेतला. तोपर्यंत त्यानं क्रीज सोडलं होतं. त्यामुळे तो धावबाद झाला. त्यावरुन रवींद्र जाडेजा याच्यावर अनेकांनी टीका केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रवींद्र जाडेजा यानं सरफराज खान याची जाहीर माफी मागितली आहे. 

नेमकं झालं काय ? - 

इंग्लंडविरोधात रवींद्र जाडेजा यानं जिगरबाद शतक ठोकलं. पण तो 99 धावांवर खेळत होता. त्यावेळी सरफराज खान धावबाद झाला. त्याला रवींद्र जाडेजा जबाबदार असल्याचं  सर्वांचं म्हणणं आहे. रवींद्र जाडेजा यानं चेंडू फटकावल्यानंतर एक धाव घेण्यासाठी सरफराजला कॉल दिला. पण चेंडू जेम्स अँडरसनच्या हातात असल्याचं दिसल्यानंतर माघार घेतली. पण तोपर्यंत सरफराज खूप पुढे आला होता, तो मागे जाईपर्यंत अँडरसन यानं दांड्या उडवल्या. सरफराज खान धावबाद झाला. रवींद्र जाडेजा यानं नंतर शतक पूर्ण केले. पण सोशल मीडियावर रवींद्र जाडेजा यानं धावबाद केल्याची जोरदार चर्चा रंगली. 

रवींद्र जाडेजानं मागितली जाहीर माफी - 

सरफराज खान पदार्पणातच शानदार फलंदाजी करत होता. त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण दुर्वैवीरित्या तो धावबाद झाला. रवींद्र जाडेजाच्या कॉलमुळे तो धावबाद झाला होता. त्यामुळे रवींद्र जाडेजा यानं मोठ्या मनानं त्याची माफी मागितली. जाडेजानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून त्यामध्ये माफी मागितली. त्याशिवाय सरफराज चांगला खेळल्याचेही तो म्हणाला. रवींद्र जाडेजाने इंस्टाग्राम स्टेरिला लिहिले की, “वाईट वाटत आहे. सरफराज मी चुकीचा कॉल दिला होता. पण तू चांगला खेळला.” जडेजाच्या इंस्टा स्टोरिचे स्क्रीनशॉट्स सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व -

राजकोट कसोटीत  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. पण रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 5 विकेट्सच्या मोबदल्यात 326 धावा इतकी आहे. रोहित शर्मा (131) आणि रवींद्र जडेजा (110*) यांनी भारतासाठी पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. तर सरफराज खान (Sarfaraz Khan) याने 66 चेंडू खेलून 62 धावा केल्या.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget