एक्स्प्लोर

R Ashwin Team India : आशिया कपच्या हालचाली सुरू असताना अश्विनचं नाव कोचसाठी पुढं, 'या' खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला यशापेक्षा पराभवांचीच जास्त चव चाखावी लागली आहे.

Cheteshwar Pujara on R Ashwin Future Coach Team India : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला यशापेक्षा पराभवांचीच जास्त चव चाखावी लागली आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर गंभीर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही टीम इंडियाला दारुण पराभव सहन करावा लागला. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे त्यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झाला. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिल्याने गंभीर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सध्या टीम इंडिया आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने माजी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन याला भविष्याचा सर्वात योग्य प्रशिक्षक म्हणून पसंती दिली आहे. तो अश्विनलाच का सर्वोत्तम पर्याय मानतो, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 पुजारा का मानतोय अश्विन योग्य पर्याय?

ESPNcricinfo च्या एका प्रश्नोत्तर सत्रात पुजाराला विचारण्यात आलं की, भारताचा भविष्यातला कोच कोण होऊ शकतो? त्यावर त्याने कोणतीही शंका न घेता थेट अश्विनचं नाव घेतलं. पुजाराचं म्हणणं आहे की, अश्विन खेळ खूप बारकाईने समजतो आणि फलंदाजी-गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याची पकड उत्तम आहे. त्यामुळेच तो कोच पदासाठी मजबूत दावेदार ठरू शकतो.

आयपीएल 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अश्विनने शेवटचं आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळलं. पण हा हंगाम त्याच्यासाठी विस्मरणीय ठरला. त्याने 9 सामन्यांत फक्त 7 विकेट घेतले आणि 283 धावा दिल्या. CSK ची कामगिरीही अत्यंत खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे संघ 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला आणि सर्वात खालच्या स्थानावर राहिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनची कामगिरी

अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रवीचंद्रन अश्विनचा करिअर अत्यंत शानदार राहिला आहे. तो भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून निवृत्त झाला. अश्विनने एकूण 765 बळी घेतले, तर अनिल कुंबळे 956 बळीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. अश्विनने टीम इंडियासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3503 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियासाठी अश्विनने 116 एकदिवसीय सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 156 विकेट घेतल्या आहेत आणि 707 धावा केल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये अश्विनने 72 विकेट घेतल्या आहेत आणि 184 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 619 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा - 

Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बोर्डाचा धक्कादायक निर्णय; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, जाणून घ्या A टू Z

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget