एक्स्प्लोर

R Ashwin Team India : आशिया कपच्या हालचाली सुरू असताना अश्विनचं नाव कोचसाठी पुढं, 'या' खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला यशापेक्षा पराभवांचीच जास्त चव चाखावी लागली आहे.

Cheteshwar Pujara on R Ashwin Future Coach Team India : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला यशापेक्षा पराभवांचीच जास्त चव चाखावी लागली आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर गंभीर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही टीम इंडियाला दारुण पराभव सहन करावा लागला. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे त्यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झाला. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिल्याने गंभीर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सध्या टीम इंडिया आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने माजी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन याला भविष्याचा सर्वात योग्य प्रशिक्षक म्हणून पसंती दिली आहे. तो अश्विनलाच का सर्वोत्तम पर्याय मानतो, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 पुजारा का मानतोय अश्विन योग्य पर्याय?

ESPNcricinfo च्या एका प्रश्नोत्तर सत्रात पुजाराला विचारण्यात आलं की, भारताचा भविष्यातला कोच कोण होऊ शकतो? त्यावर त्याने कोणतीही शंका न घेता थेट अश्विनचं नाव घेतलं. पुजाराचं म्हणणं आहे की, अश्विन खेळ खूप बारकाईने समजतो आणि फलंदाजी-गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याची पकड उत्तम आहे. त्यामुळेच तो कोच पदासाठी मजबूत दावेदार ठरू शकतो.

आयपीएल 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अश्विनने शेवटचं आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळलं. पण हा हंगाम त्याच्यासाठी विस्मरणीय ठरला. त्याने 9 सामन्यांत फक्त 7 विकेट घेतले आणि 283 धावा दिल्या. CSK ची कामगिरीही अत्यंत खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे संघ 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला आणि सर्वात खालच्या स्थानावर राहिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनची कामगिरी

अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रवीचंद्रन अश्विनचा करिअर अत्यंत शानदार राहिला आहे. तो भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून निवृत्त झाला. अश्विनने एकूण 765 बळी घेतले, तर अनिल कुंबळे 956 बळीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. अश्विनने टीम इंडियासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3503 धावा केल्या आहेत. 

टीम इंडियासाठी अश्विनने 116 एकदिवसीय सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 156 विकेट घेतल्या आहेत आणि 707 धावा केल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये अश्विनने 72 विकेट घेतल्या आहेत आणि 184 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 619 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा - 

Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बोर्डाचा धक्कादायक निर्णय; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, जाणून घ्या A टू Z

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमधून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, कव्हर्स हटवले, पण मैदान ओले असल्याने खेळाला विलंब, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
AUS vs BAN 1st Test : आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?
आधी फलंदाजीत फजिती, मग गोलंदाजीत धुलाई; आता फिल्डिंगनेही लाज काढली, एकेकाळी जगाला धडकी भरवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला झालंय तरी काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget