एक्स्प्लोर

"मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला"; धोनीनंतर आता गंभीरवर भडकला स्टार क्रिकेटर, धमकी दिल्याचा केला आरोप

Team India Crickter Manoj Tiwari: आधी धोनीला फैलावर घेतल्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर मनोज तिवारीनं आता गौतम गंभीरला फैलावर घेतलं आहे.

Manoj Tiwary on Gautam Gambhir: बंगाल आणि टीम इंडियाकडून (Team India) खेळणारा स्टार क्रिकेटर मनोज तिवारी (Manoj Tiwary) यानं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तिवारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) चिडला. शतक झळकावूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याचा मनात साठलेला राग तिवारीनं बोलून दाखवला. शतक झळकावूनही मला प्लेईंग इलेव्हनमधून का वगळण्यात आलं? हे मला धोनीला विचारायचं होतं, असं तिवारी म्हणाला होता. आता धोनीला फैलावर घेऊन झाल्यानंतर मनोज तिवारीनं आपला मोर्चा गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) वळवला आहे. तसेच, गंभीरनं धमकी दिल्याचा आरोपही तिवारीनं केला आहे. 

धोनीनंतर गंभीरकडे वळवला तिवारीनं मोर्चा 

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर आता मनोज तिवारीनं आपला मोर्चा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे वळवला आहे. त्यानं गौतम गंभीरला थेट फैलावर घेतलं आहे. तिवारीनं एक धक्कादायक खुलासा करत गंभीरवर आरोप केले आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार गौतम गंभीरसोबत वाद झाला होता, त्यानंतर गंभीरनं तिवारीला धमकी दिली होती. तेव्हा गंभीर आणि तिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळायचे. 2013 च्या आयपीएल हंगामात अरुण जेटली स्टेडियमवर ही घटना घडली होती. 

"मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला" 

मनोज तिवारीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "भांडण झाल्यानंतर गंभीर मला म्हणाला की, "मॅचनंतर मला बाहेर भेट, मी तुला बघतो. आज तुझं काम संपलं" तिवारी पुढे म्हणाला की, त्यानं असं करायला नको होतं. त्यावेळी सामना कोटला मैदानात सुरू होता. तिथे पत्रकारांची गर्दीही होती. गंभीरचे शब्द सर्वांनीच ऐकले होते. 

तिवारी म्हणाला की, "मला अजूनही गंभीरसोबतच्या लढाईचा पश्चाताप होतो, कारण मी अशा लोकांपैकी नाही, जे वरिष्ठांशी भांडतात. ती घटना टाळता आली असती. माझे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, पण एका घटनेमुळे माझी बदनामी झाली. एकेकाळी गंभीरशी संबंध चांगले होते. म्हणूनच मला जास्त पश्चाताप होतो. केकेआरकडून खेळताना त्याच्याशी अनेकदा चर्चा झाली. संघात कोणाचा समावेश करायचा, हेही मी ठरवायचो. सर्व क्रिकेटपटूंचं मत घेतलं जायचं."

आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी खेळल्यानंतर मनोज तिवारी 2010 मध्ये केकेआरमध्ये सहभागी झाले. तिवारी 2012 मध्ये आयपीएलचा खिताब पटकावणाऱ्या केकेआर संघाचाही भाग होता. चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या विरोधात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये तिवारीनंच ड्वेन ब्रावोनं टाकलेल्या चेंडूवर विजयी चौकार लगावत केकेआरला आयपीएलचा खिताब पटकावून दिला होता. पण 2013 च्या मोसमात, तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरसोबत भांडण झालं होतं, त्यानंतर त्याला आयपीएल 2014 पूर्वी रिलीज करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2024 Schedule: 10 शहरं, 17 दिवस अन् 21 सामने; 22 मार्चपासून IPL 2024 चा महासंग्राम, शेड्यूलमध्ये यंदा काय स्पेशल? A to Z माहिती

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report
Sunil Kedar : नागपूर ग्रामीण काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget