एक्स्प्लोर

विराट-रोहितची दमदार अर्धशतके, पहिल्या दिवसाअखेर भारत 4 बाद 288 धावा

विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी नाबाद शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरलाय.

India vs West Indies 2nd Test : रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 288  धावा केल्या आहेत. विराट कोहली 87 आणि रविंद्र जाडेजा 36 धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार अर्धशतके झळकावली.

भारताचा मध्यक्रम झटपट कोसळळा. पण विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. जाडेजा ८४ चेंडूवर चार चौकारासरह ३६ धावांवर नाबाद आहे. तर १६१ चेंडूत विराट कोहली ८७ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत आठ चौकार लगावले. विराट कोहलीने आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार फलंदाजी केली.

भारताची दमदार सुरुवात -

यजमान वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी वनडे स्टाईल सुरुवात केली.पहिल्या कसोटी सामन्यात द्वितकी भागिदारी करणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही या जोडीने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 139 धावांची भागिदारी केली. 

रोहित-यशस्वीची दमदार अर्धशतके -

रोहित शर्माने 80 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार आणि 9 चौकार लगावले. रोहित शर्मा याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकले. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले होते, दुसऱ्या कसोटी सामन्यात 80 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या कसोटी सामन्यात दीडशतकी खेळी केली होती. पदार्पणात यशस्वीने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दुसऱ्या सामन्यातही यशस्वीने दमदार फलंदाजी केली. यशस्वी जयस्वाल याने अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 74 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वालने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.

अजिंक्य-गिल यांचा फ्लॉप शो - 
शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीमध्येही मोठी खेळी करता आली नाही. या दोघांनी निराश केले. शुभमन गिल याने बारा चेंडूत दहा धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणए याला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अजिंक्य रहाणे याने ३६ चेंडूमध्ये फक्त आठ धावांचे योगदान दिले. 

दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्माने केलेले विक्रम -

कर्णधार असताना रोहित शर्माने 150  षटकारांचा पल्ला पार केला. 

रोहित शर्माने माजी कर्णधार एम एस धोनीचा विक्रम मोडला. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू झालाय. 

जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या दोन हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू आहे.  दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने  33 कसोटी सामन्यातील 55 डावात 1942 धावा चोपल्या आहेत. 

रोहित शर्माने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता.

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. लागोपाठ दोन सामन्यात शतकी भागिदारी करणारी सहावी सलामी जोडी ठरली आहे. याआधी भारताकडून विरेंद्र सेहवाग-मुरली विजय, सुनील गावसकर- फारुख इंजिनिअर, अंशुमन गायकवाड-सुनील गावसकर, अरुण लाल-सुनील गावसकर आणि सदगो्पन रमेश आणि देवांश गांधी यांचा क्रमांक लागतो. त्याशिवाय विदेशात लागोपाठ दोन शतकी भागिदारी करण्याचा विक्रमही रोहित आणि यशस्वीच्या नावावर झालाय. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget