India Squad for England : आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी, पण श्रेयस अय्यरला टीम इंडियात मिळणार नाही जागा? इंग्लंड दौऱ्याआधी मोठी अपडेट
India Squad for England Series 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे.

India Squad for England Series 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका जवळपास एक महिना दूर आहे, सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीमुळे सलामीवीर आणि क्रमांक-4 फलंदाजाची जागा रिकाम्या झाल्या आहेत. आता श्रेयस अय्यरबद्दल एका मीडिया रिपोर्टमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे.
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस अय्यरला घेऊन जाईल, यांची शक्यता फारच कमी आहे. वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, जर भारतीय संघ देशांतर्गत मालिका खेळत असता तर अय्यरला संघात स्थान मिळाले असते, परंतु परदेश दौऱ्यावर त्याला कदाचित टीम इंडियामध्ये स्थान मिळणार नाही.
श्रेयस अय्यरने जिंकला नाही निवडकर्त्यांचा विश्वास...
त्याच सूत्राने सांगितले की, श्रेयस अय्यरला त्याच्या लाल चेंडूच्या खेळावर अजून थोडे काम करावे लागेल. अय्यर पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे, तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता. असेही म्हटले गेले की, शॉर्ट बॉल ही एकमेव समस्या नाही तर इंग्लंडमध्ये चेंडूमध्ये स्विंग देखील असेल, म्हणून चेंडू सोडण्याची कला असणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये चेंडू कसा सोडायचा हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, असे सूत्राने सांगितले.
त्याच वृत्तानुसार, बीसीसीआयच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, "श्रेयस अय्यर स्वाभाविकपणे आक्रमक क्रिकेट खेळतो आणि वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चेंडू मारायचा की नाही हे ठरवणे त्याच्यासाठी कठीण होऊ शकते." श्रेयसला संघात स्थान न मिळण्यामागे हे एक मोठे कारण असू शकते.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाची तुफानी कामगिरी
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी आहे. त्यांनी एकूण 11 सामने खेळले आहेत. यापैकी संघाने 7 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबचे सध्या एकूण 15 गुण आहेत. पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.
पण, जर पंजाबने दोन सामने जिंकले तर संघ पहिल्या दोनमध्येही स्थान मिळवू शकतो. फलंदाजीत, प्रभसिम्शन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी या हंगामात खूप प्रभावित केले आहे. त्याच वेळी, कर्णधार श्रेयस अय्यर देखील त्याच्या बॅटमधून भरपूर धावा काढत आहे. गोलंदाजीत मार्को जॅन्सन आणि अर्शदीप सिंग चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच वेळी, युजवेंद्र चहल संघासाठी सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे.





















