Eng vs Ind 4th Test : शून्यावर दोन विकेट! टीम इंडियाच्या इतिहासातील काळा दिवस, 42 वर्षांचा विक्रम मोडला, भारतावर पराभवाचे संकट
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने आपली पकड भक्कम केली आहे आणि भारतावर पराभवाचे मोठे संकट ओढवले आहे.

Team India Lost first two wickets for no run after 1983 : मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने आपली पकड भक्कम केली आहे आणि भारतावर पराभवाचे मोठे संकट ओढवले आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 358 धावांच्या प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव चौथ्या दिवशी 669 धावांवर संपला. अशाप्रकारे, यजमान संघाला 311 धावांची आघाडी मिळाली. त्याच वेळी, जेव्हा भारत दुसऱ्या डावात खेळण्यासाठी आला, तेव्हा त्याने पहिल्याच षटकात शून्यावर दोन विकेट गमावल्या. अशाप्रकारे, भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात 42 वर्षांच्या इतिहासात हे पहिलेच वेळा आहे, जेव्हा त्याने 0 धावांवर पहिल्या दोन फलंदाजांचे बळी गमावले आहेत.
पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के
ही मोठी आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारतावर दडपण आणले. दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेला भारत पहिल्याच षटकात कोलमडला. क्रिस वोक्सने चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये जो रूटकडून झेलबाद केलं आणि जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे भारताची पहिली विकेट शून्यावर गेली.
TWO IN TWO!
— England Cricket (@englandcricket) July 26, 2025
Nicked straight to Harry Brook. WHAT A START! 🤯
🇮🇳 0️⃣-2️⃣ pic.twitter.com/qbokPo7iKj
त्याच वेळी, पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा साई सुदर्शन काही विशेष करू शकला नाही आणि तोही खाते न उघडता दुसऱ्या स्लिपमध्ये हॅरी ब्रूककडे झेल दिला. सुदर्शनने वोक्सचा चेंडू खेळायचा की सोडायचा हे ठरवण्यास विलंब केला आणि जेव्हा तो बाहेर सोडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये गेला, जिथे ब्रूकने कोणतीही चूक केली नाही. अशाप्रकारे, सुदर्शन गोल्डन डकवर बाद झाला आणि भारताने त्यांचे दोन्ही पहिले विकेट 0 च्या धावसंख्येवर गमावले.
42 वर्षात पहिल्यांदाच लाजीरवाणी सुरुवात
भारताने आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 42 वर्षांनी पुन्हा एकदा अशी सुरुवात केली आहे. याआधी डिसेंबर 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 0 धावांवर पहिल्या दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्या वेळी अंशुमान गायकवाड आणि दिलीप वेंगसरकर शून्यावर बाद झाले होते. त्या सामन्यात सुनील गावसकरने चौथ्या क्रमांकावर येऊन 236 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती, आणि त्यांच्या कारकिर्दीतील ती एकमेव खेळी होती जी त्यांनी चौथ्या क्रमांकावर येऊन केली होती.
भारतावर पराभवाचे संकट
भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत लाजीरवाणी ठरली आहे. इंग्लंडकडून मिळालेली मोठी आघाडी, आणि त्यावर ही धक्कादायक सुरुवात त्यामुळे भारतीय संघावर पराभवाचे संकट आहे. केएल राहुल आणि शुभमन गिलकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. भारताचा स्कोअर 2 विकेटसाठी 42 धावा आहे. शुभमन गिल 31 चेंडूत 5 चौकारांसह 27 धावांवर आहे. केएल राहुल 46 चेंडूत 2 चौकारासह 14 धावांवर आहे. भारत अजूनही 269 धावांनी मागे आहे.
हे ही वाचा -





















