एक्स्प्लोर

जो रुट एकटाच भारताच्या अख्या फलंदाजांवर भारी, आकडे पाहून थक्क व्हाल! 

IND Vs ENG : इंग्लंडविरोधात 15 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघ (Team India) मोठ्या अडचणीत सापडलाय. अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची (Team India) फलंदाजी अतिशय कमकुवत वाटत आहे.

IND Vs ENG : इंग्लंडविरोधात 15 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघ (Team India) मोठ्या अडचणीत सापडलाय. अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची (Team India) फलंदाजी अतिशय कमकुवत वाटत आहे. विराट कोहली (Virat Kohli),  केएल राहुल (KL Rahul) यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी अतिशय दुबळी दिसत आहे. भारताच्या अख्या फलंदाजांवर एकटा जो रुट (Joe Root) वरचढ दिसतोय. होय, इंग्लंडविरोधात मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियातील सर्वात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वगळता शुभमन गिल याने फक्त दहापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. इतर फलंदाज 10 कसोटी सामनेही खेळले नाहीत. भारताच्या सगळ्या फलंदाजांनी खेळलेल्या कसोटी सामन्यापेक्षा जो रुटने खेळलेले सामने जास्त आहेत. त्याशिवाय धावांही जो रुट याच्या जास्त आहेत. 

दुखापतीमुळे केएल राहुल तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये सरफराज खान अथवा देवदत्त पड्डीकल पदार्पण करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण असेल? याबाबत लवकरच समोर येईल. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, रजत पाटीदार, धघ्रुव जुरेल/केएस भरत यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. यामध्ये रोहित शर्माने 56 कसोटी सामने खेळले आहेत. तर शुभमन गिल 22 कसोटी सामन्यासह दुसरा अनुभवी फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर केएस भरत आहे, त्याने 07 सामने खेळले आहेत. तिसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जायस्वाल सहा कसोटी सामने खेळलाय. तर रजत पाटीदार याने नुकतेच पदार्पण केलेय. सरफराज खान अथवा ध्रुव जुरेल यांनी अद्याप पदार्पण केले नाही.

 इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट याने आतापर्यंत 137 कसोटी सामने खेळले आहेत. भारताच्या सगळ्या फलंदाजांनी 98 कसोटी सामने खेळले आहेत. म्हणजेच, भारताच्या अख्ख्या फलंदाजांवर एकटा रुट भारी पडतोय. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारताची सर्वात मोठी अडचण विराट कोहली नसणं ही होय. विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. विराट कोहलीकडे 100 पेक्षा जास्त कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय केएल राहुलही दुखापतीमुळे खेळत नाही. राहुल 50 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलाय. विराट कोहली आणि राहुलच्या अनुपस्थित भारताची फलंदाजी कमकुवत जाणवत आहे. अशा स्थितीमध्ये रोहित शर्मा याच्यावर मोठी भिस्त असेल.

टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 

1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला

आणखी वाचा :

KL राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर, देवदत्त पड्डीकलला संधी

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget