एक्स्प्लोर

IND vs SA: सूर्याचा शतकी तडाखा, यशस्वीचं वादळी अर्धशतक, भारताचा 201 धावांचा डोंगर 

IND vs SA T20I Series: निर्णायक टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. त्याशिवाय युवा यशस्वी जायस्वाल याने अर्धशतक ठोकले.

IND vs SA 3rd 1st Innings: निर्णायक टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. त्याशिवाय युवा यशस्वी जायस्वाल याने अर्धशतक ठोकले. दोघांच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 201 धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादव याने 100 तर यशस्वी जायस्वाल याने 60 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून विल्यमस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेला मालिका विजयासाठी 202 धावांचे आव्हान मिळाले आहे. 

सूर्याचा शतकी तडाखा - 

दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 8 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने टी 20 क्रिकेटमधील दुसरे शतक ठोकले. सूर्याने यशस्वी जायस्वाल याच्यासोबत शतकी भागिदारी केली. त्यानंतर रिंकूसोबत 47 धावांची भागिदरी केली. सूर्याने चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 200 पार नेली.

यशस्वी जायस्वालचं अर्धशतक - 

यशस्वी जायस्वाल याने आज शानदार खेळी केली. यशस्वीच्या बॅटमधून चौकार आणि षटकांराचा पाऊस पडला. यशस्वीने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेस आहे. यशस्वी जायस्वाल याने सूर्यकुमार यादव याच्यासोबत 29 धावांची सलामी दिली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासोबत शतकी भागिदारी केली. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर यशस्वी जायस्वाल आणि सूर्याने मोर्चा संभाळला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेची गोलंदाजी फोडली. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या आणि यशस्वी यांनी 70 चेंडूत 112 धावांची भागिदारी केली. 

तिलक वर्मा गोल्डन डक - 
शुभमन गिल माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने मैदानात येताच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न केला, पण तो बाद झाला. तिलक वर्मिाने केशव महाराजचा चेंडू मिड-ऑफच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सर्कलच्या बाहेरही गेला नाही.  चेंडू थेट कॅप्टन मार्करामच्या हातात विसावला. अशाप्रकारे तिलक वर्माला खाते न उघडताच तंबूत परत जावं लागलं. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली.   जितेश शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी चार चार धावा काढता आल्या. 

केशव महाराजने लागोपाठ दोन धक्के दिले..

टीम इंडियाने 'करो या मरो'च्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दोन षटकात 29 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने चेंडू केशव महाराज याच्याकडे सोपवाला. केशव महाराजने येताच लागोपाठ दोन विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवर त्याने शुभमन गिल याला तंबूत धाडले, तर त्यानंतर शून्यावर तिलक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला. शुभमन गिलने महाराजचा चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला अन् एलबीडब्ल्यू बाद झाला. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही. 

आफ्रिकेची गोलंदाजी कशी राहिली ?

आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वात प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 26 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.  एल विल्यमस याने दोन विकेट घेतल्या, पण तो महागडा ठरला. त्याने चार षटकात 46 धावा खर्च केल्या. त्याशिवाय एन बर्गर याने आणि तरबेज शम्सी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget