एक्स्प्लोर

IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताकडून कुठं झाली चूक? जाणून घ्या पराभवाची कारणं

IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.

Reasons behind India Defeat against South Africa: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात भारतानं निश्चितच वर्चस्व गाजवलं, पण काही चुकांमुळं भारताच्या पदरात निराशा पडली. भारतीय संघाकडून नेमकं कुठं चूक झाली? हे जाणून घेऊयात.

रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं महागात पडलं
रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं भारतीय संघाच्या पराभवातील एक महत्वाचं कारण आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 29 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 16 व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरनं रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडला. त्यावेळी रासी 30 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. मात्र, जीवनदान मिळाल्यानंतर त्यानं आक्रमक फलंदाजी करत पुढच्या 16 चेंडूत 45 धावा ठोकत भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला.

पंतच्या नेतृत्वात कमतरता
या सामन्यात ऋषभ पंतच्या कर्णधारपदात काही कमतरता जाणवल्या. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलकडून त्याला संपूर्ण षटक काढता आलं नाही. चहलनं फक्त 2.1 षटकं टाकली. युजवेंद्र चहल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याच्याकडून संपूर्ण षटक करून घेतले असते तर, कदाचित भारताला विकेट्स मिळाली असती. पण, ऋषभ पंतनं तसं केलं नाही. 

भारताची खराब गोलंदाजी
कोणत्याही सामन्यात 200 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठणं प्रत्येक संघासाठी आव्हानत्मक असतं. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 212 धावांचं लक्ष्य 19.1 षटकातचं गाठलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून दाखवली. फक्त आवेश खानला सोडलं तर, इतर गोलंदाजांची इकोनॉमी 10 पेक्षा अधिक होती. हार्दिक पांड्यानं त्याच्या एका षटकात 18 धावा खर्च केल्या. तर भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांसारख्या गोलंदाजांनी प्रत्येकी 40 हून अधिक धावा दिल्या. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget