एक्स्प्लोर

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

IND vs NZ 2nd Test Match :  पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीनं पुन्हा एकदा कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली आहेत.

IND vs NZ, 2nd Test Match: भारत आणि न्यूजीलंड यांच्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडिएमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीनं पुनरागमन केलं आहे. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टॉम लेथम न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करत आहे. योगायोगानं दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार पाहायला मिळाले. यापूर्वी  132 वर्षांपूर्वी दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार झाले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल झाले. अंजिक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीमुळे बाहेर बसला. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्य़ा कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची धुरा टॉम लेथमकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 132 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

1889 मध्येही दोन कसोटी मालिकेत चार कर्णधार -
1889 मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये दोन सामन्यात चार कर्णधार झाले होते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत चार कर्णधार झाले होते.  दक्षिण अफ्रीकाकडून ओवेन डुनेल आणि विलियम मिल्टन कर्णधार झाले होते. तर इंग्लंडकडून ऑब्रे स्मिथ आणि माँटी वोडेनहुई यांनी कर्णधारपद सांभाळलं होतं. दोन सामन्यात चार कर्णधार होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आता 2021 मध्ये अशी घटना घडली आहे.

 

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

मयांकची शतकी खेळी - 
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने (Mayank Agarwal) टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलने (Ajaz Patel) चमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत. सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
Mumbai Indians IPL 2026 : IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
Shreyas Iyer News : टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
WTC Points Table : एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?
एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget