एक्स्प्लोर

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

IND vs NZ 2nd Test Match :  पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीनं पुन्हा एकदा कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली आहेत.

IND vs NZ, 2nd Test Match: भारत आणि न्यूजीलंड यांच्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडिएमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीनं पुनरागमन केलं आहे. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टॉम लेथम न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करत आहे. योगायोगानं दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार पाहायला मिळाले. यापूर्वी  132 वर्षांपूर्वी दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार झाले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल झाले. अंजिक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीमुळे बाहेर बसला. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्य़ा कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची धुरा टॉम लेथमकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 132 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

1889 मध्येही दोन कसोटी मालिकेत चार कर्णधार -
1889 मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये दोन सामन्यात चार कर्णधार झाले होते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत चार कर्णधार झाले होते.  दक्षिण अफ्रीकाकडून ओवेन डुनेल आणि विलियम मिल्टन कर्णधार झाले होते. तर इंग्लंडकडून ऑब्रे स्मिथ आणि माँटी वोडेनहुई यांनी कर्णधारपद सांभाळलं होतं. दोन सामन्यात चार कर्णधार होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आता 2021 मध्ये अशी घटना घडली आहे.

 

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

मयांकची शतकी खेळी - 
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने (Mayank Agarwal) टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलने (Ajaz Patel) चमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत. सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget