एक्स्प्लोर

India lost 5th Test : मालिकाविजयापासून भारत थोडक्यात हुकला, हातातील सामना भारताने गमावला, कुठे झाली नेमकी चूक?

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीमध्ये सात विकेट्सनी भारताने सामना गमावला. एकावेळी सामन्यात चांगल्या स्थितीत असणारा भारताच्या हातातून बघता-बघता सामना निसटला.

India vs England : भारतीय संघाने गमावलेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ एक सामना नसून इंग्लंडच्या भूमीत जाऊन मालिकाविजयाची सुवर्णसंधी होती. मालिकेत आधी 2-1 च्या आघाडीवर असणाऱ्या भारताने हा सामना जिंकला असता तर मालिकाही जिंकली असती. पण भारताने सामना गमावल्याने मालिका अनिर्णित सुटली. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आघाडीवर होता. सामना भारतच जिंकेल असे वाटत होते, पण तेव्हाच इंग्लंडने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे बघता-बघता सामना भारताच्या हातातून निसटला. तर या पराभवासाठी कारणीभूत काही महत्त्वाची कारणं पाहूया...

  • सर्वात आधी म्हणजे नाणेफेक गमावल्यामुळे फलंदाजी आलेल्या भारताची सुरुवातच अत्यंत खराब गेली. अवघ्या 100 धावांच्या आतच सर्व आघाडीचे फलंदाज असा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर जाडेजा आणि पंतने शतकं ठोकत डाव सावरला, पण इंग्लंडच्या खेळाडूंचा वाढलेला आत्मविश्वास पुढील इनिंगमध्येही भारताला मागे टाकण्यात त्यांना महत्त्वाचा ठरला
  • सामन्यात भारतीय संघानं गोलंदाजीत कमाल केली नाहीच पण क्षेत्ररक्षणातही भारत खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी अगदी सहज धावा केल्या. त्यातच सामनावीर जॉनीने दोन्ही डावात शतक ठोकलं. पण दुसऱ्या डावातील त्याच्या शतकापूर्वी अवघ्या 14 धावांवर असताना हनुमा विहारीने त्याचा झेल सोडला. ज्यानंतर त्याने शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
  • क्षेत्ररक्षणात खराब कामगिरी करणाऱ्या भारताच्या पराभवातील सर्वात मुख्य कारण खराब गोलंदाजी ठरलं. दुसऱ्या डावात इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण बुमराहने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची 109 वर 3 बाद अशी अवस्था केली. त्यानंतरही तब्बल 378 धावांचं टार्गेट इंग्लंडने 7 गडी राखून पूर्ण केलं. यातून भारताने किती खराब गोलंदाजी केली याचा परिचय येतोय.
  • तर यानंतरचं आणथी एक कारण म्हणजे सामन्यात भारताचा संकटमोचक ठरलेल्या ऋषभ पंतने केलेल्या दोन चूका. त्याने 31 व्या ओव्हरमध्ये जाडेजाच्या चेंडूवर एक चूकीचा रिव्ह्यू घेतला. त्यावेळी जो रूटच्या पॅडला लागून बॉल मागे गेला होचा. बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पण त्याचवेळी पंतने गडबडीत रिव्ह्यू घेतला. ज्यामुळे भारताने रिव्ह्यू गमावला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्येही मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये पंतने चूकीचा रिव्ह्यू घेत आणखी एक रिव्ह्यूय गमावला. त्यामुळे 203 धावा ठोकणाऱ्या पंतने या दोन चूकाही सामन्यात केला.
  • भारताच्या पराभवात आणखी एक मोठं कारण म्हणजे नवखा कर्णधार. पहिल्यांदाच भारताचं कसोटीत नेतृत्त्व करणाऱ्या बुमराहला अधिक अनुभव नसल्याने तो खास नेतृत्त्व करु शकला नाही. ज्यामुळे गोलंदाजांची निवड, फिल्ड सेट अशा काही महत्त्वाच्या गोष्टीत टीम इंडियाची गल्लत झाली आणि सामना भारताच्या हातातून निसटला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget