एक्स्प्लोर

IND vs AUS Delhi Test: दिल्लीच्या मैदानात भारताचा शानदार आहे रेकॉर्ड, 36 वर्षांपासून गमावलेला नाही एकही सामना

IND vs AUS : भारतीय टीम आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

IND vs AUS, Delhi Test : भारतीय संघाने (Team India) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने नागपुरात (Nagpur Test) खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. आता या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Delhi Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा आतापर्यंतचा विक्रम अगदी दमदार राहिला आहे. दिल्लीच्या मैदानात भारताने एकूण 34 टेस्ट सामने खेळले असून यामधील 13 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाला शेवटचा पराभव 1987 मध्ये वेस्टइंडीजकडून मिळाला होता.

दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व स्पष्टपणे पाहायला मिळाले. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची असल्याने येथे चेंडूला फारशी उसळी मिळणं अपेक्षित नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करणं पुन्हा एकदा कांगारू संघासाठी मोठी समस्या बनू शकते. दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाचा कसोटी विक्रम पाहिला तर गेल्या 36 वर्षांपासून येथे कोणताही विरोधी संघ विजय मिळवू शकलेला नाही. कायम भारतच जिंकला आहे. 2017 मध्ये या मैदानावर शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध भारताने खेळला होता. या सामन्यात विराट कोहलीने 243 धावांची शानदार खेळी केली होती. मात्र, नंतर हा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आतापर्यंत, भारतीय संघाने दिल्लीच्या मैदानावर एकूण 34 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 13 सामने जिंकले आहेत, तर भारताला 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1987 साली या मैदानावर टीम इंडियाला शेवटच्या वेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

दिल्लीत ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खराब

जर  दिल्लीच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डचा विचार केला तर, त्यांनी येथे आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. 1959 च्या दौऱ्यावर या मैदानावर कांगारू संघाने भारतीय संघाचा एक डाव आणि 127 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांना 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर 3 सामने अनिर्णित राहिले. 2013 च्या दौऱ्यात कांगारू संघाने या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांना 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार? टीम इंडियाच्या कोचचं 'ते' रोखठोक वक्तव्य चर्चेत 
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार?  टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मिळणार की नाही?  टीम इंडियाच्या कोचचं रोखठोक वक्तव्य चर्चेत
IND vs ENG 2nd T20 Playing 11 : अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले
टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget