एक्स्प्लोर

INDvsAUS | IND vs AUS : तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया अडचणीत, बायो बबल नियमाचं उल्लघन केल्यानं रोहित शर्मासह पाच खेळाडू आयसोलेट

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला खेळवला जाणार आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना पार पडणार आहे. मात्र या कसोटी सामन्याआधी टीम इंडिया नव्या अडचणीत अडकलेली दिसत आहे. बायो बबल सिक्युरिटी प्रोटोकॉलचे नियम मोडल्यामुळे भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह एकूण पाच खेळाडू संघातून अलग करण्यात आलं आहे.

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर या खेळाडूंना दोन्ही संघांच्या खेळाडूंपासून वेगळं करुन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना दोन्ही संघातील उर्वरित खेळाडूंना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र ते सराव करु शकणार आहेत.

खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका बायो-बबलमध्ये खेळली जात आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघातील खेळाडूंना बायो-बबलमधून बाहेर जाऊ दिले जाणार नाही. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कारवाईपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऋषभ पंतकडून बायो बबल नियमांचं उल्लंघन, टीम इंडियाच्या अडचणी वाढणार?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये ते एका हॉटेलमध्ये जेवताना दिसत आहेत. वास्तविक, हे पाच जण मेलबर्नमधील बीबीक्यू रेस्टॉरंटच्या सिक्रेट किचनमध्ये दिसत आहेत. तर बायो बबल नियमानुसार परवानगी केवळ बाहेर बसून खाण्याची आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांनी पुष्टी केली की खेळाडूंनी रेस्टॉरंटला भेट दिली आणि आत बसले. नवलदीप सिंग नावाच्या एका भारतीय चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचं 118.69 डॉलर्सचे बिल दिलं असल्याचं सांगितलं.

ऋषभ पंतने आपल्याला मिठी मारल्याचं नवलदीपने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. नवलदीपने उत्साहाच्या भरात भारतीय खेळाडूंसोबत आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, मात्र त्यामुळे भारतीय संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. टीम इंडिया सध्या बायो बबल झोनमध्ये असून अशा परिस्थितीत पाचही खेळाडू बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. इतकच नव्हे तर पंतने बायो बबलमध्ये नसलेल्या एका व्यक्तीला मिठी मारली. त्यामुळे या प्रकरणी टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 RCB Playoffs Scenarios : टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
KKR vs GT LIVE score IPL 2026 : गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
KKR vs GT LIVE Update : गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
Mohsin Naqvi's Visit to India : 'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी भारतात येणार; पंतप्रधानांची परवानगी मागितली, पाकिस्तानच्या दाव्याने खळबळ, नेमकं कारण काय?
'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी भारतात येणार; पंतप्रधानांची परवानगी मागितली, पाकिस्तानच्या दाव्याने खळबळ, नेमकं कारण काय?
IPL च्या गुणतालिकेत जबरदस्त ट्विस्ट! फक्त 11 सामने बाकी, तरी प्लेऑफसाठी कोणाचंही तिकीट नाही पक्कं; 8 संघांत शर्यत, कोण मारणार बाजी?
IPL च्या गुणतालिकेत जबरदस्त ट्विस्ट! फक्त 11 सामने बाकी, तरी प्लेऑफसाठी कोणाचंही तिकीट नाही पक्कं; 8 संघांत शर्यत, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget