एक्स्प्लोर

ICC टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वल; इंग्लंड कसोटीनंतर अंतिम सामन्याबाबत निर्णय

भारताला आता इंग्लंडबरोबरची चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकारने जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने असं केलं तर जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आपले स्थान निश्चित करेल.

ICC Test Championship: क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळालं. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मालिका विजयासह टीम इंडिया पुन्हा एकदा ICC Test Championship स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. यानंतर आता टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या शक्यता वाढली आहे.

एडलेडमध्ये खेळलेली पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मेलबर्नमधील कसोटी सामना जिंकला तर सिडनीमध्ये सामना अनिर्णित राखला. यानंतर, मंगळवारी ब्रिस्बेनमधील निर्णायक कसोटी सामना तीन विकेट्सने जिंकून टीम इंडियाने मालिका खिशात घातली.

Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य

ICC Test Championship स्पर्धेत 71.7 टक्के गुणांसह भारताने अव्वल स्थान गाठलं आहे. तर 70 टक्के गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत आस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. आस्ट्रेलिया आता 69.2 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड कसोटीनंतर अंतिम सामन्याबाबत निर्णय

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. ‘गाबा कसोटीतील दणदणीत विजयांनंतर भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे’, असं ट्वीट आयसीसीने केलं आहे.

भारताला आता इंग्लंडबरोबरची चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकारने जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने असं केलं तर जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आपले स्थान निश्चित करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत 5 फेब्रुवारीपासून होणारी कसोटी मालिका सुरू होणार आहे.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्रथमच अष्टपैलू अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

India Gabba Test Win Historic | गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, 1988 नंतर पहिला पराभव

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
वेस्ट इंडिजने पाकिस्तानची लाज काढली! WTC Points Tableमध्ये बाबरची टीम तळाशी; कांगारू अव्वल, टीम इंडिया कुठे?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Priyanka Gandhi and Pralhad Joshi: प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
प्रियांका गांधींच्या भाषणातील 'ते' वाक्य भाजपला का झोंबलं? शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींबाबतचा नेमका वाद काय?
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Embed widget