एक्स्प्लोर

Asia Cup 2022 : 'हे असं अधिक काळपर्यंत होणं योग्य नाही,' ऋषभ पंतच्या संघात नसण्यावर गंभीरचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाला...

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 मधील सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानला भारताने मात दिली. यावेळी संघात ऋषभ पंत नसल्याने अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.

Gautam Gambhir On Rishabh Pant : आशिया कप 2022 च्या (Asia Cup 2022) सलामीच्या सामन्यातच भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्ने विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी पाकिस्तानने दिलेली झुंजही अगदी कडवी होती. त्यामुळे भारतीय संघाचा खेळ कुठेतरी कमी पडला अशाही प्रतिक्रिया येत आहेत. त्यात संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) संघात नसल्यानेही अनेक प्रतिक्रिया येत होत्या. त्यात माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दिलेली प्रतिक्रियाही महत्त्वाची असून त्याने संघ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तान संघाविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने फिनिशर म्हणून यष्टीरक्षक फलंदाजाची जागा ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिक याला दिली. कार्तिकने मागील वर्षभरात खासकरुन आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. पण पंतचा फॉर्मही कायम असल्याचं दिसून आलं आहे. त्यामध्ये यंदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) होणार असून त्यापूर्वी संघात इतके आणि सततचे बदल करणं योग्य नाही असं गंभीरनं म्हटलं आहे.

बॅकअप असणं योग्य, पण X Factor आहे पंत

पाकिस्तानविरुद्ध ऋषभ पंत अंतिम 11 मध्ये नव्हता. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया यावेळी समोर आल्या. याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, ''टी20 विश्वचषकासाठी अधिक काळ उरलेला नाही. भारतीय संघाकडे आशिया कपनंतर केवळ 5 ते 6 टी20 सामनेच सरावासाठी आहेत. अशामध्ये भारताकडे बॅकअप म्हणून खेळाडू असणं ठिक आहे, पण ऋषभ पंत संघातील एक्स फॅक्टर असल्याने त्यला अंतिम 11 मध्ये ठेवायलाच हवं. तसंच भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असणं आवश्यक असल्याचंही गंभीर म्हणाला.

भारताचा 5 विकेट्सनी विजय

पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं.  भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget