Eng vs Ind 1st Test : एक क्षणात सगळं संपलं! अवघ्या 31 धावांत टीम इंडियाचे सहा शिलेदार गारद, लीड्स टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडला इतक्या धावांची गरज
Eng vs Ind 1st Test Day-4 Stumps : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला आहे.

England vs India 1st Test Day 4 : मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या आहेत, त्यामुळे इंग्लंडला आता पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 371 धावा कराव्या लागतील. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, परंतु टेल-एंडर्स खराब कामगिरी करत अपयशी ठरले.
Innings Break!
— BCCI (@BCCI) June 23, 2025
Centuries from KL Rahul and vice-captain Rishabh Pant power #TeamIndia to 364 in the 2nd innings 👏👏
Target for England - 3⃣7⃣1⃣
Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/oPPeyNfbj3
दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल अन् साई सुदर्शन फेल
भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या आणि इंग्लंडने प्रत्युत्तरात त्यांच्या पहिल्या डावात 465 धावा केल्या. अशाप्रकारे, टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाची सुरुवात 6 धावांच्या आघाडीने केली, परंतु त्याच सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात फक्त 4 धावा करून बाद झाला. गेल्या डावात शून्य धावांवर बाद झालेल्या साई सुदर्शनने यावेळी खाते उघडले, पण तो 30 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही.
केएल राहुल आणि ऋषभ पंतने ठोकले शतक
कर्णधार शुभमन गिललाही पहिल्या डावातील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि यावेळी तो फक्त 8 धावा काढून बाद झाला. परिणामी, भारतीय संघाने 92 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. येथून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी जबाबदारी स्वीकारली आणि 195 धावांची मोठी भागीदारी केली. ऋषभ पंतनेही या सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकून इतिहास रचला आहे. पंत 118 धावा काढून बाद झाला. केएल राहुल 137 धावा काढून बाद झाला तेव्हा भारतीय संघाचा स्कोअर 333/5 होता.
The calm and the storm. Together = 💥#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia pic.twitter.com/FNCoJFS5Mo
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 23, 2025
अवघ्या 31 धावांत पत्त्यांसारखी कोसळली टीम इंडिया
दुसऱ्या डावात एका वेळी टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 333 धावा केल्या होत्या. येथून इंग्लंडच्या गोलंदाजांनी लागोपाठ विकेट्स घेतल्या. परिस्थिती अशी होती की भारतीय संघाचे शेवटचे 6 विकेट्स फक्त 31 धावांच्या आत पडले. भारतीय संघ 400 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य पाहण्याचे स्वप्न पाहत असला तरी, इंग्लंडला फक्त 371 धावांचे लक्ष्य देऊ शकला. जोश टँगने असा कहर केला की त्याने एकाच षटकात शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचे शिकार केली.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला आहे. खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात कोणताही पराभव न होता 21 धावा केल्या आहेत आणि आता पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्यांना आणखी 350 धावा करायच्या आहेत. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जॅक क्रॉली 12 धावांसह आणि बेन डकेट 9 धावांसह खेळत होते. जर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर मंगळवारी इंग्लंडच्या सर्व 10 विकेट घ्याव्या लागतील.
Stumps on Day 4 in Headingley 🏟️
— BCCI (@BCCI) June 23, 2025
England 21/0, need 350 runs to win
All eyes on the final day of the Test 🙌
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/MJOK5iFmBG





















