एक्स्प्लोर

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या का खेळत नाही? शेवटची कसोटी कधी खेळली?

India vs Australia Border Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी उद्या पर्थ  येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु होणार आहे. 

IND vs AUS Border Gavaskar Trophy 2024 पर्थ : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 च्या पहिल्या कसोटीला पर्थमध्ये सुरुवात होत आहे. यावेळी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने ऑस्ट्रेलियात होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह भारतीय संघ पहिली कसोटी खेळणार आहे. या तिघांच्या जोडीला भारताचे युवा खेळाडू असतील. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा याचं आव्हान देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर असणार आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर असलेला हार्दिक पांड्या कसोटी  क्रिकेटपासून गेली बरीच वर्षे दूर आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी सामने का खेळत नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

हार्दिक पांड्या का कसोटी खेळत नाही?

हार्दिक पांड्या आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. हार्दिक पांड्या सारखा ऑलराऊंडर संघात असणं भारतीय संघासाठी फायदेशीर ठरलं असतं मात्र, गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पांड्यानं कसोटी सामना खेळलेला नाही. कसोटी क्रिकेटमधील हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली राहिली आहे.मात्र, दुखापतीच्या कारणामुळं ऑगस्ट 2018 पासून हार्दिक भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या फिटनेसच्या कारणामुळं कसोटी खेळत नाही, अशी माहिती आहे. 2018-19 पासून कंबर दुखापतीचा सामना हार्दिक पांड्या करत आहे. त्यानंतर काही काळ हार्दिक पांड्यानं गोलंदाजी करणं देखील बंद केलं होतं.  

कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजाला खूप ओव्हर गोलंदाजी करायची असते. दुखापतींचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याला ते करणं शक्य नाही.  त्यामुळं हार्दिक पांड्या अनेकदा वनडे सामन्यात देखील 10 ओव्हर गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही.  फिटनेसच्या कारणामुळं हार्दिक पांड्यानं 2018 नंतर कसोटी संघात पुनरागमन केलेलं नाही.  

हार्दिक पांड्याची कसोटी कारकीर्द

हार्दिक पांड्यानं 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं एक शतक आणि चार अर्धशतकं केली आहे.  त्याच्या नावावर एकूण 532 धावा आहेत. हार्दिकनं गोलंदाजी करताना 17 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये हार्दिकनं 3469 धावा केल्या असून 173 विकेट घेतल्या आहेत. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटलं की त्यानं जर कसोटी क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं असतं तर त्याला वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसती. 

इतर बातम्या :

मराठवाड्यात मविआला धक्का बसणार, महायुती बाजी मारणार, axis MY INDIA च्या एक्झिट पोलचा अंदाज

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget