एक्स्प्लोर

Bananas scam For BCCI : क्रिकेटपटूंनी 35 लाखांची केळी खाल्ली, BCCI ला हायकोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

आशिया कप 2025 वर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 9 सप्टेंबरपासून आठ संघांमध्ये या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे.

Bananas scam For BCCI : आशिया कप 2025 वर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 9 सप्टेंबरपासून आठ संघांमध्ये या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच 10 सप्टेंबरला टीम इंडिया पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. पण यादरम्यान एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नोटीस बजावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यात लाखो रुपये केवळ केळ्यांवर खर्च केल्याचा आरोप आहे. हा नेमका घोटाळा काय आहे? तो चर्चेत कसा आला? आणि त्याचे धागेदोरे बीसीसीआयशी कसे जोडले गेले? हे जाणून घेऊया...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला उत्तराखंड उच्च न्यायालयाने तब्बल 12 कोटी रुपयांच्या गैरवापराच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याचे उघड झाले आहे आणि याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ खेळाडूंसाठी केळी खरेदी करण्यावर खर्च करण्यात आल्याचे ऑडिट अहवालात नमूद आहे. याशिवाय खेळाडूंना फळे देण्याच्या नावाखाली आणि इतर बाबींमध्येही प्रचंड रकमेचा उधळपट्टीत वापर झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

केळ्यांवर खर्चले 35 लाख रुपये?

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, उत्तराखंड उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ केळी खरेदीसाठी खर्च करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार असून, बीसीसीआयलाही यावर आपले उत्तर द्यावे लागणार आहे.

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या ऑडिट अहवालानुसार, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तब्बल 6.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच टूर्नामेंट व ट्रायल्सवर एकूण 26.3 कोटी रुपये उधळले गेले, जे मागील आर्थिक वर्षाच्या 22.3 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त आहेत. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, उत्तराखंड असोसिएशनने खाण्यापिण्याच्या खर्चाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.

उत्तराखंड क्रिकेट बोर्डचे वाद

उत्तराखंड क्रिकेट बोर्डावर याआधीही गंभीर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. 2022 मध्ये उघड झाले होते की, खेळाडूंना 12 महिन्यांच्या काळात सरासरी दररोज केवळ 100 रुपये दिले जात होते, जे राज्यातील किमान वेतनापेक्षाही कमी आहे. एवढेच नव्हे, तर उत्तराखंड संघातील खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिक शोषणाचेही आरोप केले होते. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही प्रचंड गैरव्यवहार केला होता.

हे ही वाचा -

Prithvi Shaw Sapna Gill Case Update : तुला ही शेवटची वॉर्निंग...; मुलीच्या छेडछाड प्रकरणात पक्का फसला पृथ्वी शॉ, मुंबई हायकोर्टाने ठोठावला दंड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Embed widget