एक्स्प्लोर

Babar Azam : शाहिद आफ्रिदीच्या जावयासह बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांना दणका, भारत सरकारनं उचललं मोठं पाऊल

Babar Azam : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं आक्रमक धोरण स्वीकारलं आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना भारत सरकारनं दणका दिला आहे.

नवी दिल्ली : भारत सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि सेलिब्रेटींच्या यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे. शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानी खेळाडूंना भारत सरकारनं आणखी दणका दिला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानी कलाकार हनिया अमीर आणि अली फैझल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. 

भारत सरकारनं पाकिस्तानचा ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू अर्शद नदीमच्या इन्स्टाग्राम खात्यावर बंदी घालण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26  जणांचा मृत्यू झाला होता. हा भ्याड दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला करण्यात एळा होता. 

भारत सरकारनं बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, अर्शद नदीम यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर बंदी घातली आहे. काही नेटकऱ्यांना या खेळाडूंच्या अकाऊंटवर भारतात हे अकाऊंट उपलब्ध नाही, असा मेसेज दिसत आहे. 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला हल्ला केला होता. या दहशतवादी  हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 6 जण महाराष्ट्रातील होते. भारत सरकारनं या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानातील सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या भारतातील प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय शोएब अख्तर, बासित अली, शाहीद आफ्रिदी यांच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या भारत सरकारनं बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी  यांच्या इन्स्टाग्राम खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.  याशिवाय पाकिस्तानी सेलिब्रेटी  माहिरा खान आणि अली झफर यांची इन्स्टाग्राम खाती देखील ब्लॉक करण्यात आली आहे.

दरम्यान, भारत सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. भारत सरकारनं सिंधू जल करार स्थगित करण्याचा प्रमुख निर्णय घेतला. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना दिले गेलेले व्हिसा रद्द करण्यात आले. जे पाकिस्तानी लोक भारतात होते त्यांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करी कारवाई संदर्भात सैन्य दलाला सर्वाधिकार दिलेले आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानचा बदला घेतला जाईल, असं देखील म्हटलं आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : क्लासवरुन येताना खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले, दोन सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना
क्लासवरुन येताना खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले, दोन सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना
Nilesh Ghaywal : लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा फेक पत्ता, पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टला अहिल्यानगर पोलिसांची संमती
लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा फेक पत्ता, पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टला अहिल्यानगर पोलिसांची संमती
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर? कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या आशिया कपचे नियम
भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर? कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या आशिया कपचे नियम
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : क्लासवरुन येताना खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले, दोन सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना
क्लासवरुन येताना खेळता-खेळता वाहत्या गटारीत पडले, दोन सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना
Nilesh Ghaywal : लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा फेक पत्ता, पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टला अहिल्यानगर पोलिसांची संमती
लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा फेक पत्ता, पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या पासपोर्टला अहिल्यानगर पोलिसांची संमती
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर? कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या आशिया कपचे नियम
भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर? कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या आशिया कपचे नियम
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2025 | शनिवार
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
अधिकारी नवऱ्याचे भाजप आमदार पत्नीला पत्र; माझा फोटो वापरू नका, तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना द्या
पाऊस बनलाय वैरी, लातुरात बचाव पथकांना पाचारण,धाराशिव, बीडसह उर्वरित भागात बिकट अवस्था
पाऊस बनलाय वैरी, लातुरात बचाव पथकांना पाचारण,धाराशिव, बीडसह उर्वरित भागात बिकट अवस्था
Embed widget