एक्स्प्लोर

समालोचक शिवरामकृष्णनांच्या बीसीसीआय पॅनेलमधून तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ, वर्णभेदाचा गंभीर आरोप; शेन वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी सचिनला दिलं होतं ट्रेनिंग

शिवरामकृष्णन 2000 सालापासून समालोचन करत होते. त्यांनी आयसीसी क्रिकेट समितीवर खेळाडू प्रतिनिधी म्हणूनही काम केले. ते 1983 ते 1986 या काळात भारतासाठी नऊ कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले.

Laxman Sivaramakrishnan: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वंशभेदाचा आरोप करत बीसीसीआयच्या समालोचन पॅनेलमधून राजीनामा दिला आहे. शिवरामकृष्णन यांनी शुक्रवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "मी बीसीसीआयसाठी समालोचन करण्यापासून निवृत्त होत आहे." लक्ष्मण शिवरामकृष्णन आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत नाणेफेक आणि बक्षीस वितरणासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला संधी न मिळाल्याने निराश झाले होते. नवीन समालोचकांना सतत संधी मिळत राहिली, तर आपल्याकडे बराच काळ दुर्लक्ष केले गेले, असे त्यांनी म्हटलं आहे. 

नाणेफेक आणि बक्षीस वितरणसाठी पाठवलं नाही

शिवरामकृष्णन यांनी सांगितले की, निवृत्तीमागे टीव्ही निर्मितीशी संबंधित एक मोठी कहाणी आहे, जी लवकरच उघड होईल. जेव्हा एका युझरने वंशभेदाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा त्यांनी त्याचे समर्थन करत हा वाद आणखी वाढवला. त्यांनी लिहिले की, "मला नाणेफेक आणि बक्षीस वितरण करण्याची संधी मिळाली नाही." शिवरामकृष्णन म्हणाले, "गेल्या 23 वर्षांपासून मला नाणेफेक आणि बक्षीस वितरण समारंभासाठी पाठवले गेले नाही, उलट खेळपट्टीचा अहवाल, नाणेफेक आणि बक्षीस वितरण समारंभासाठी नवीन लोकांना पाठवले जात आहे." रवी शास्त्री प्रशिक्षक असतानासुद्धा मला पाठवले गेले नव्हते, तर याचा अर्थ काय असू शकतो?'

ते म्हणाले, "बीसीसीआयच्या हक्क कंपनीची काय अवस्था असेल याचा कोणीही अंदाज लावू शकतो. माझी निवृत्ती ही काही मोठी गोष्ट नाही, पण टीव्ही निर्मितीबद्दल एक नवीनच कहाणी समोर येत आहे. संपूर्ण चित्र लवकरच तुमच्यासमोर स्पष्ट होईल." जेव्हा एका वापरकर्त्याने विचारले की त्यांच्या त्वचेचा रंग हा काही मुद्दा आहे का, तेव्हा शिवरामकृष्णन यांनी उत्तर दिले, "तुम्ही बरोबर आहात. वर्णद्वेष." शिवरामकृष्णन हे दोन दशकांहून अधिक काळ समालोचन कक्षातील आपल्या स्पष्टपणासाठी ओळखले जातात.

20 वर्षांहून अधिक काळ समालोचन

शिवरामकृष्णन 2000 सालापासून समालोचन करत होते. त्यांनी आयसीसी क्रिकेट समितीवर खेळाडू प्रतिनिधी म्हणूनही काम केले. ते 1983 ते 1986 या काळात भारतासाठी नऊ कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले. 1984 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 12 बळी घेऊन ते चर्चेत आले. ऑस्ट्रेलियात झालेल्या 1985 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीने संघाच्या विजयात योगदान दिले.

शिवरामकृष्णन कोण आहेत?

1980 च्या दशकाच्या सुरुवातीला, वयाच्या 17 व्या वर्षी, त्यांनी आपल्या दमदार लेग-स्पिन, गुगली आणि टॉप-स्पिन गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. 1997-98 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा दौरा केला, तेव्हा सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी शिवरामकृष्णन यांची मदत घेतली होती. शिवरामकृष्णन यांची क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नसली तरी, त्यानंतर त्यांनी समालोचक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Rishabh Pant : उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या सहायक प्रशिक्षकानं मौन सोडलं, फलंदाजीवर सल्ला देत म्हणाले... 
उपकर्णधारपद गेल्यानं रिषभ पंत नाराज? टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकानं मौन सोडलं, नेमकं काय म्हटलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget