एक्स्प्लोर

फिटनेससाठी BCCI घेणार भारतीय क्रिकेटपटूंची आणखी एक परीक्षा

आता भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटपटूंना यो-यो टेस्टसोबतच आणखी एका चाचणीला सामोरं जावं लागणार आहे

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि त्यांचं आरोग्य अधिकाधीक सुदृढ आणि निरोगी असण्याची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुळात आता संघाचं यशच खेळाडूंच्या निरोगी आरोग्यावर संपूर्णत: अवलंबून आहे. भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली याच्या नेतृत्त्वामध्ये अनेक खेळाडूंनी शारीरिक सुदृढतेलाही तितकंच महत्त्वं दिल्याचं पाहायला मिळालं.

किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय खेळाडूंमध्ये मैदानावरही चपळता पाहायला मिळाली. असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला क्रिकेटचा स्तर पाहता शारीरिक सुदृढतेकडे तसूभर दुर्लक्षही संघाला अडचणीत टाकणारं ठरु शकतं. त्यामुळं बीसीसीआयनं आता याच दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

खेळाडूंचा वेग आणि एन्ड्युरन्स तपासून पाहण्यासाठी बीसीसीआय यापुढं खेळाडूंची 2-km time trial 2 किमी टाईम ट्रायल घेणार आहे. BCCI शी संलग्न असणाऱ्या सर्वच खेळाडूंसाठी ही चाचणी अनिवार्य असेल. त्यामुळं यो-यो टेस्टसोबतच आता संघात स्थान मिळवण्यासाठी BCCI कडून घेण्यात येणाऱ्या आणखी एका परीक्षेला खेळाडूंना सामोरं जावं लागणार आहे. फक्त सामोरंच नव्हे, तर त्यात त्यांनी उत्तीर्ण होणंही अपेक्षित असणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना बीसीसीआयशी संलग्न अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या यशात त्यांची शारीरिक सुदृढता महत्त्वाची भूमिका बजावून गेली असंही त्यांनी स्पष्ट केलं. असं असलं, तरीही आता आपणच काही परिसीमा ओलांडत पुढचा टप्पा गाठण्यासाठीच हा निर्णय घेतला गेल्याचंही ते म्हणाले. शिवाय येत्या वर्षांमध्ये सातत्यानं खेळाडूंच्या आरोग्य आणि सुदृढतेच्या दृष्टीनं काही परीक्षा घेण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे नवी परीक्षा?

BCCI च्या या नव्या परीक्षेमध्ये वेगवान गोलंदाजाला 2 किमी टाईम ट्रायल रन 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकी गोलंदाजांना ही ट्रायल रन 8 मिनिटं 30 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी खेळाडूंना किमान 17.1 अंकांची आवश्यकता असणाऱ आहे. संघातील सर्वच खेळाडूंना या चाचणीबाबत माहिती देण्यात आली आहे.

ही नवी परीक्षा आगामी T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान निश्चित करु इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी अनिवार्य असणार आहे. या चाचणीसाठी बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील Strength and Conditioning सदस्यांची उपस्थिती असेल.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Embed widget