एक्स्प्लोर

फिटनेससाठी BCCI घेणार भारतीय क्रिकेटपटूंची आणखी एक परीक्षा

आता भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेटपटूंना यो-यो टेस्टसोबतच आणखी एका चाचणीला सामोरं जावं लागणार आहे

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि त्यांचं आरोग्य अधिकाधीक सुदृढ आणि निरोगी असण्याची गरज दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुळात आता संघाचं यशच खेळाडूंच्या निरोगी आरोग्यावर संपूर्णत: अवलंबून आहे. भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली याच्या नेतृत्त्वामध्ये अनेक खेळाडूंनी शारीरिक सुदृढतेलाही तितकंच महत्त्वं दिल्याचं पाहायला मिळालं.

किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय खेळाडूंमध्ये मैदानावरही चपळता पाहायला मिळाली. असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला क्रिकेटचा स्तर पाहता शारीरिक सुदृढतेकडे तसूभर दुर्लक्षही संघाला अडचणीत टाकणारं ठरु शकतं. त्यामुळं बीसीसीआयनं आता याच दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

खेळाडूंचा वेग आणि एन्ड्युरन्स तपासून पाहण्यासाठी बीसीसीआय यापुढं खेळाडूंची 2-km time trial 2 किमी टाईम ट्रायल घेणार आहे. BCCI शी संलग्न असणाऱ्या सर्वच खेळाडूंसाठी ही चाचणी अनिवार्य असेल. त्यामुळं यो-यो टेस्टसोबतच आता संघात स्थान मिळवण्यासाठी BCCI कडून घेण्यात येणाऱ्या आणखी एका परीक्षेला खेळाडूंना सामोरं जावं लागणार आहे. फक्त सामोरंच नव्हे, तर त्यात त्यांनी उत्तीर्ण होणंही अपेक्षित असणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना बीसीसीआयशी संलग्न अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या यशात त्यांची शारीरिक सुदृढता महत्त्वाची भूमिका बजावून गेली असंही त्यांनी स्पष्ट केलं. असं असलं, तरीही आता आपणच काही परिसीमा ओलांडत पुढचा टप्पा गाठण्यासाठीच हा निर्णय घेतला गेल्याचंही ते म्हणाले. शिवाय येत्या वर्षांमध्ये सातत्यानं खेळाडूंच्या आरोग्य आणि सुदृढतेच्या दृष्टीनं काही परीक्षा घेण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे नवी परीक्षा?

BCCI च्या या नव्या परीक्षेमध्ये वेगवान गोलंदाजाला 2 किमी टाईम ट्रायल रन 8 मिनिटं 15 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकी गोलंदाजांना ही ट्रायल रन 8 मिनिटं 30 सेकंदांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. तर, यो-यो टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी खेळाडूंना किमान 17.1 अंकांची आवश्यकता असणाऱ आहे. संघातील सर्वच खेळाडूंना या चाचणीबाबत माहिती देण्यात आली आहे.

ही नवी परीक्षा आगामी T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान निश्चित करु इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी अनिवार्य असणार आहे. या चाचणीसाठी बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील Strength and Conditioning सदस्यांची उपस्थिती असेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Harshvardhan Sadgir : जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही,आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी बनलो, मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
मला संपल्यात जमा केलेलं, डबल महाराष्ट्र केसरी झालो, आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतोय : हर्षवर्धन सदगीर
Maharashtra Kesari Final :मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
मोठी बातमी, हर्षवर्धन सदगीर बनला सातवा डबल महाराष्ट्र केसरी, अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत
Australia : ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  
ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget