Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 May 2017 10:20 PM (IST)
1/6
अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या तीन वर्षात सरकारने अनेक कामं केली, अनेक आश्वासनं दिली, तर अनेक प्रश्नांवरुन सरकारला जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागला. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तीन वर्षात कशा प्रकारे काम केलं, याची पडताळणी 'एबीपी न्यूज'च्या तज्ज्ञांनी केली आहे. एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील 24 मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाच्या आधारे 50 तज्ञांच्या टीमने गुण दिले. या टीममध्ये देशभरातील नामांकित 50 पत्रकारांचा समावेश होता. मंत्र्यांना दहापैकी गुण देण्यात आले. ज्यांना पाचपेक्षा कमी गुण मिळाले, त्यांना खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.