Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 06 Dec 2016 09:10 AM (IST)
1/11
2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत विज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला.
2/11
2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत विज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला.
3/11
2016 साली अम्मांनी दारुबंदीसाठी मोठं पाऊल उचलत राज्यातील 500 दारुची दुकानं बंद केली.
4/11
1992 साली अम्मांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी 'क्रेडल बेबी स्कीम' सुरु केली.
5/11
अम्मांनी 2001 साली मंदिरांमध्ये जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद केली. मात्र 2004 साली निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
6/11
सत्तेत आल्यानतंर अम्मांनी 21 जून 2001 साली रात्री 2 वाजता राजकीय विरोधक करुणानिधी यांना तरुंगात टाकलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र नंतर करुणानिधी यांची सुटका करण्यात आली.
7/11
चेन्नई : तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची जे बोलणार ते करुनच दाखवणार अशी ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षांना मात देण्यास यश मिळालं.
8/11
तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच महिला पोलिस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय अम्मांनी घेतला. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी महिला पोलिस स्टेशन आणि महिला पोलिस कर्मचारी तैनात केले.
9/11
संपकरी कामगारांवर कडक कारवाई करत अम्मांनी 2001 साली एकदाच 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. या निर्णयानंतर अम्मांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.
10/11
तामिळनाडुमध्ये अम्मांनी 2001 साली मोठा निर्णय घेत लॉटरी तिकिटांवर बंदी घातली.
11/11
गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी जयललिता यांनी 2013 साली अल्पदरात जेवण देणारी 'अम्मा कँटिन' सुरु केली. या कँटिंनमध्ये एक रुपयात इडली, तीन रुपयांत दोन चपात्या, पाच रुपयात सांबर-लेमन राईस किंवा दही भात दिला जातो.