ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे.
2/7
शिवरायांच्या जीवनात स्वराज्याची राजधानी रायगडचे महत्व मोठं आहे. आज त्याच किल्ल्यावर शिवरायांचे दोन दिमाखदार पुतळे बसवण्यात आले आहेत.
3/7
जवळपास पावणे चारशे वर्षानंतरही हे किल्ले वादळ-वारे सोसत उभे आहेत. ते शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.
4/7
या किल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याकरता राज्यात अनेक संघटना आणि शिवप्रेमी झटत आहेत.
5/7
शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यांचा वापर केला. त्यामुळे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुलाही ते चकवा देऊ शकले.
6/7
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात.
7/7
उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.