एक्स्प्लोर
PHOTO: सातपुड्याच्या दुर्गम भागातील हजारो नागरिकांना मदतीचा हात, नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
Nandurbar latest updates Manish khatri
1/10

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या दर्या- खोर्यातील दुर्गम अशा 64 गावामध्ये राहणार्या 52 हजार 595 नागरिकांना नंदुरबार जिल्हा प्रशासनाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
2/10

महसूल आणि अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून 5 हजार 520 एवढा क्विंटल गहू, 16 हजार 109 क्विंटल तांदूळ आगामी चार महिन्यांसाठी पोहोचविण्यात आला आहे.
3/10

जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.
4/10

नंदुरबार जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे तापी नदी ओलांडली की सुरू होतात त्या पूर्व- पश्चिम पसरलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा.
5/10

या डोंगर रांगेतील दर्या- खोर्यात आदिवासी बांधव नर्मदा नदीच्या काठावर वर्षानुवर्षे वास्तव्य करून आहेत.
6/10

त्यापैकी अनेकांचा उदरनिर्वाह हा वनोपजांवर आणि हंगामी शेतीवर अवलंबून.
7/10

त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात अन्न उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
8/10

पावसाळा सुरू होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आणि पावसाळ्यात जवळपास 64 गावांमधील संपर्क तुटतो.
9/10

या गावातील नागरिकांना चार महिने पुरेल इतका अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात प्रशासनाच्या वतीने पोहचविण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उडद्या, बादल, भामाणे, सावर्यादिगर, भाबरी, मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे या भागात पावसाळ्यात वाहने जात नाही.
10/10

पावसाळ्याच्या परिस्थितीत येथील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना पावसाळ्याचे चार महिने (जून ते सप्टेंबर) पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.
Published at : 13 Jun 2022 02:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























