Written By : abp majha web team | Updated at : 11 Nov 2021 03:52 PM (IST)
kangna ranaut
1/7
Kangana Ranaut Statement : आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या कंगना रनौतनं (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतला आहे. (photo: kanganaranut/ig)
2/7
यामुळे तिच्यावर सोशल मीडियात टीका होत आहे. (photo: kanganaranut/ig)
3/7
कंगना रनौत नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. (Photo:@kanganaranaut/IG)
4/7
‘1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं’, असं वक्तव्य कंगना रनौत हिनं वृतवाहिनीच्या कार्यक्रमात केलं आहे. (photo: kanganaranut/ig)
5/7
कंगानाच्या या वक्तव्याचा भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी समाचार घेतला असून हा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा अपमान असल्याचा टोला लगावला आहे. (photo: kanganaranut/ig)
6/7
वरुण गांधी यांनी कंगनावर निशाणा साधलाय, वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ (photo: kanganaranut/ig)
7/7
काही दिवसांपूर्वीच कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आपला चौथा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारलाय (photo: kanganaranut/ig)