Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
Vaibhav Mangle:या पोस्टवर सध्या चाहत्यांच्या आणि कोकणवासीयांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .

Vaibhav Mangle Post: मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वैभव मांगले (Vaibhav Mangle) कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. सध्या कोकणातल्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर केलेली त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. कोकणात ज्या प्रकारे उत्तर येतील लोक जमिनी घेत आहेत, आंबा व्यवसाय पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक रोजगार ताब्यात घेत असल्याच्या बदलावर अभिनेता वैभव मांगलेने चिंता व्यक्त केली आहे. या पोस्टवर सध्या चाहत्यांच्या आणि कोकणवासीयांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .
नेमकं काय म्हणाला वैभव मांगले?
अभिनेता वैभव मांगलेने instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणाला ' ज्याप्रकारे कोकणात, विशेषतः किनारपट्टी भागात, उत्तरेकडील लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत. पर्यटन आणि आंबा व्यवसाय ताब्यात घेत आहेत,ते पाहता भविष्यात चित्र वेगळं असू शकतं. भैय्या, नेपाळी कामाला ठेवले जात आहेत. नारळ काढायला केरळी लोक येतायत त्यावरून लवकरच कोकणवासीयांना हिंदी, नेपाळी, गुजराती, मल्याळम भाषा शिकाव्या लागतील असं दिसतंय.' असं तो म्हणालाय.
View this post on Instagram
चहात्यांच्या प्रतिक्रिया..
या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एका चाहत्याने म्हटले," याला पूर्णपणे चॉकलेट असलेला कोकणी माणूस जबाबदार आहे. कारण त्यांना काम करायची नाही. तुम्ही हे स्वतः अनुभवलं असेल, कारण तेव्हा आपण चाकरमानी कोकणात जातो तेव्हा आपण त्यातील स्थानिक ग्रामस्थांना काही लहान सहन काम देतो तेव्हा ते काहीतरी कारणे सांगून ते काम करायला येत नाही, शेवटी आपल्याकडे पर्याय उरत नाही परप्रांतीयांना काम देण्याशिवाय..' अनेकांनी वैभव मांगलेच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे. सगळीकडे हेच चाललं आहे असंही काही जणांनी म्हटलं.






















