एक्स्प्लोर

पाण्यावरुन भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढणार?

भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये पाणी प्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीवर सध्या जलसंकट ओढवले आहे. कराची आणि आपसपासच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे. या परिसरातील लोकांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान भारतानेदेखील पाण्याबाबत देशांतर्गत एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणानुसार भारतातील 70 टक्के लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्या देशात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत उभय देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरुन मोठा वाद होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला आहे. या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. यावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. या जलविद्युत प्रकल्पाचा दाखला देत भारताकडून सिंधू जल कराराचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त केली जात आहे. चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प आणि पाकिस्तानमधील पाणीटंचाई या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पथक नेमले आहे. हे पथक चिनाब नदीजवळ प्रकल्पाची पाहणीदेखील करणार आहे. दुसऱ्या बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरू शकतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
आम्ही सर्वकाही उद्ध्वस्त करु, तेलाचा ताबा घेऊ, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा, दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार
आम्ही सर्वकाही उद्ध्वस्त करु, तेलाचा ताबा घेऊ, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा, दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget