एक्स्प्लोर

सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने पाक परराष्ट्र मंत्र्यांचा तिळपापड

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपलं भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.

न्यूयॉर्क : सीमेवरील पाकिस्तानच्या नापाक हरकतींमुळे दोन्ही देशांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रामध्ये (यूएन) सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही पाहायला मिळाला. वेस्टिन हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे देखील उपस्थित होते. मात्र दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपलं भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या. सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने शाह महमूद कुरेश चवताळलेले दिसून आले. ''मी त्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी क्षेत्रीय सहकार्याबाबत भाष्य केलं. क्षेत्रीय सहभाग कसा शक्य आहे, जर कुणी एकमेकांचं म्हणणं ऐकतच नसेल आणि तुम्ही त्याला ब्लॉक करत असाल,'' असं वक्तव्य त्यांनी केलं. ''त्यांची (सुषमा स्वराज) तब्येत बरी नव्हती, की काय ते माहित नाही. पण मी त्यांचं सर्व भाषण ऐकलं आणि त्या माझ्या भाषणासाठीही थांबल्या नाही,'' असं शाह महमूद कुरेशी म्हणाले. सार्कची मागची बैठक भारतच नाही, तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशकडूनही दहशतवादाबद्दल व्यक्त केलेल्या चिंतेनंतर रद्द झाली होती, तुमच्यासाठी दहशतवाद हा मुद्दाच नाही का, असा सवाल एबीपी न्यूजने विचारला. यावरही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं. आजच्या बैठकीत दहशतवादाचा मुद्दा अफगाणिस्तानने नाही, किंवा बांगलादेशनेही नाही उचलला. क्षेत्रीय वातावरण नीट होईपर्यंत सार्क बैठक रद्द करावी हा भारताने काढलेला तर्क कमकुवत आहे. नीट वातावरण काय आहे हे कोण निश्चित करणार? जगातील इतर देश बातचीत करत असतील तर सार्क समूह बातचीत का करु शकत नाही? दक्षिण आशियातील एक अब्ज 78 कोटी लोकांना हे निश्चित करावं लागेल की त्यांचं भलं कोणत्या देशाच्या हट्टासमोर गहाण ठेवलं जात आहे, असं शाह महमूद कुरेशी म्हणाले. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला घाम फोडला न्यूयॉर्कमध्ये सार्कच्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला घाम फोडला. ''क्षेत्रीय आर्थिक विकास, सुरक्षा आणि समृद्धीसाठी शांती गरजेची आहे. दहशतवाद दक्षिण आशिया क्षेत्र आणि जगासमोर मोठं आव्हान आहे. कोणत्याही भेदभावाविना दहशतवाद नष्ट करावा लागेल आणि याला संरक्षण देणाऱ्या शक्तीलाही नष्ट करणं गरजेचं आहे,'' असं सुषमा स्वराज म्हणाल्या. ''आपलं क्षेत्र आणि जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद प्रत्येक स्वरुपात नष्ट करायला हवा आणि यासाठी सहकार्य गरजेचं आहे,'' असं म्हणत पाकिस्तानने भारतावर सार्क बाबत जे आरोप केले आहेत, त्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आणि आरोप निराधार असल्याचं सांगितलं. न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या बैठकीत कुणीही भाव न दिल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. सार्कच्या मार्गातील भारत हा सर्वात मोठा अडथळा आहे, असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. एबीपी न्यूजने प्रश्न विचारला तेव्हीही पाकिस्तानकडून हेच उत्तर देण्यात आलं की भारताकडून आरोप केला जातोय, पण नीट वातावरण काय आहे, हे निश्चित कुणी करावं. काय आहे सार्क? सार्क म्हणजेच South Asian Association for Regional Cooperation ही एक क्षेत्रीय संघटना आहे, ज्यात भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुटान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget