एक्स्प्लोर

पाकच्या परराष्ट्र मंत्र्याचं भारताविरोधात भडकाऊ वक्तव्य, म्हणाले... 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना भारताचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज भारताविरोधात भडकाऊ वक्तव्य केले आहे. 

राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. तत्पूर्वी, संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताविरोधात भकाऊ वक्तव्य केले आहे. "दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे, त्यामुळे युद्ध होऊ शकते. युद्धासाठी आम्हाला काही तास नाही तर फक्त काही मिनिटे लागतील." असे मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.   

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात राजकीय संकट उभे ठाकले असतानाच शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताविरुद्ध असे भडकाऊ वक्तव्य केले आहे. 9 मार्च रोजी चुकून पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावरून कुरेशी यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. ते म्हणाले, भारताचे पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र आण्विक सक्षम होते. दोन्ही देशांकडेही अणुशक्ती आहे, त्यामुळे युद्ध होऊ शकतं. त्यासाठी आम्हाला काही तास नाही तर फक्त काही मिनिटे लागतील. दिल्लीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंतांचे नियंत्रण आहे. जगात पाकिस्तानचे कोणी ऐकत नाही. यूएनजीएमध्ये पाकिस्तानला वेगळ्या आणि भारताकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएनजीएमध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु, इम्रान खान सहभागी होऊ शकत नाहीत." 

"भारताकडे आम्ही चीनच्या नजरेने पाहतो, असे आम्हाला म्हटले जाते. आम्ही अमेरिकेचे चांगले मित्र आहोत. परंतु,  आम्ही अमेरिकेला जम्मू-काश्मीरच्या समस्येत हस्तक्षेप करण्यास सांगतो त्यावेळी ते आम्हाला द्विपक्षीयपणे हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला देतात. भारतासमोर पाकिस्तानची काही किंमत नाही. आम्हाला सर्वांशी चांगले संबंध हवे आहेत. आम्हाला कोणाशीही शत्रुत्व करायचे नाही," असे कुरेशी यांनी म्हटले आहे. 

इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना भारताचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज भारताविरोधात भडकाऊ वक्तव्य केले आहे. 

दरम्यान, इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याबाबत उपसभापतींचा बचाव करत करेशी यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांनी खासदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे. खासदारांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न कायदेशीर आहे का? विरोधकांनी बाजार मांडला आहे. आम्ही व्हिडीओ आणि पुराव्यासह निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला, परंतु, पुरावे असूनही निर्णय होऊ शकला नाही, अशी खंत कुरेशी यांनी व्यक्त केली.    

शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, "वॉशिंग्टनमध्ये 7 मार्च रोजी बैठक आयोजित केली जाते आणि 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव आणला जातो. निवडणूक घेण्याबाबत काय अटी आहेत हे सांगण्यासाठी निवडणूक आयोगाला बोलावले जाते. त्यानंतर निवडणूक आयोग म्हणतो की, आम्ही सात महिने निवडणुका घेऊ शकत नाही.  निवडणूक आयोग तीन महिन्यांत निवडणुका घेऊ शकत नाही का? अविश्वास ठराव आला नसता तर 90 दिवसांत निवडणुका झाल्या असत्या की नाही? असा प्रश्न कुरेशी यांनी उपस्थित केला. 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget