एक्स्प्लोर

पाकड्यांची पुरती जिरली, भारतीय सैन्यापुढं काहीही चाललं नाही! अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

India Pakistan War : पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं  युद्धबंदीचे उल्लंघन केले.

India Pakistan War : पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी पत्रकर परिषद घेत लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत (India Pakistan Tension)  मोठा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्याने पंतप्रधानांच्या विरोधात बंड केलं असल्याचेही बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला फोन करून भारतासोबत युद्धबंदीची मागणी केली. तथापि, युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केलं हे ही तितकेच खरं आहे. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे, परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. किंबहुना 4 दिवसांनी का होईना, युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.

भारताच्या तोडीस तोड प्रत्युत्तरानं पाकड्यांच्या धाबे दणाणले  

गेल्या 4 दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करून त्यांचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा ही नष्ट झाली आहे. हे घडताना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केलंय. भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला. 

दरम्यान, शनिवारी दुपारी 3.35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओकडून भारताच्या डीजीएमओंना फोन आला. दोघांमध्ये असा करार झाला की हल्ला होऊ नये. तथापि, दोन्ही देशांचे डीजीएमओ 12 मे रोजी पुन्हा चर्चा करतील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यांच्या 100 दहशतवाद्यांना ठार केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी निष्फळ?

भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. किंबहुना, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. दरम्यान, यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.

पाकिस्तानी सैन्याने हल्ला स्वीकारला

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कबूल केले की भारताने लढाऊ विमानांद्वारे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून या तीन हवाई तळांवर हल्ला केला होता. त्यांनी ते आक्रमक कारवाई म्हणून वर्णन केले, परंतु नुकसानाची पातळी सार्वजनिक केली नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी, हँगर्स आणि ड्रोन ऑपरेशन युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे.

 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
Weather Update: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे? 
उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
Weather Update: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे? 
उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Badlapur BJP Nagarsevak Tushar Apte: बदलापूरमध्ये भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट
बदलापूरमध्ये भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट
Embed widget