एक्स्प्लोर

पाकड्यांची पुरती जिरली, भारतीय सैन्यापुढं काहीही चाललं नाही! अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले; आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

India Pakistan War : पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं  युद्धबंदीचे उल्लंघन केले.

India Pakistan War : पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी पत्रकर परिषद घेत लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत (India Pakistan Tension)  मोठा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्याने पंतप्रधानांच्या विरोधात बंड केलं असल्याचेही बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला फोन करून भारतासोबत युद्धबंदीची मागणी केली. तथापि, युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केलं हे ही तितकेच खरं आहे. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे, परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. किंबहुना 4 दिवसांनी का होईना, युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.

भारताच्या तोडीस तोड प्रत्युत्तरानं पाकड्यांच्या धाबे दणाणले  

गेल्या 4 दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करून त्यांचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा ही नष्ट झाली आहे. हे घडताना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केलंय. भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला. 

दरम्यान, शनिवारी दुपारी 3.35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओकडून भारताच्या डीजीएमओंना फोन आला. दोघांमध्ये असा करार झाला की हल्ला होऊ नये. तथापि, दोन्ही देशांचे डीजीएमओ 12 मे रोजी पुन्हा चर्चा करतील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यांच्या 100 दहशतवाद्यांना ठार केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी निष्फळ?

भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. किंबहुना, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. दरम्यान, यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.

पाकिस्तानी सैन्याने हल्ला स्वीकारला

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कबूल केले की भारताने लढाऊ विमानांद्वारे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करून या तीन हवाई तळांवर हल्ला केला होता. त्यांनी ते आक्रमक कारवाई म्हणून वर्णन केले, परंतु नुकसानाची पातळी सार्वजनिक केली नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी, हँगर्स आणि ड्रोन ऑपरेशन युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे.

 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...

व्हिडीओ

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Embed widget