CDS Anil Chauhan : किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ती का कोसळली ते अधिक महत्त्वाचं; सीडीएस जनरल अनिल चौहानांकडून पाकिस्तानविरोधात विमानांची हानी झाल्याचे अप्रत्यक्ष मान्य
CDS Anil Chauhan : ब्लूमबर्गकडून पाकिस्तानने संघर्षादरम्यान भारतीय विमाने पाडली का? तुम्ही याची पुष्टी करू शकता का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सीडीएस चौहान यांनी वस्तुस्थिती सांगितली.

CDS Anil Chauhan : सिंगापूरमध्ये पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या दाव्यांवर संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी प्रथमचं काल (31 मे) भाष्य केले. त्यांनी सांगितले की खरा मुद्दा किती विमाने पाडण्यात आली हा नाही तर ती का पाडण्यात आली हा आहे? सीडीएस यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. ते शांग्री-ला संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. ब्लूमबर्गकडून पाकिस्तानने संघर्षादरम्यान भारतीय विमाने पाडली का? तुम्ही याची पुष्टी करू शकता का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सीडीएस चौहान यांनी सांगितले की, खरा मुद्दा किती विमाने पाडण्यात आली हा नाही, तर ती का पाडण्यात आली आणि आपण त्यांच्याकडून काय शिकलो हा आहे. भारताने आपल्या चुका ओळखल्या, त्या लवकर दुरुस्त केल्या आणि नंतर दोन दिवसांत लांब पल्ल्यावरून शत्रूच्या लक्ष्यांना लक्ष्य करून पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने दावा केला होता की त्यांनी 6 भारतीय विमाने पाडली, हे बरोबर आहे का?
सीडीएस चौहान यांनी सांगितले की, हे पूर्णपणे चुकीचे असून मोजणी महत्त्वाची नाही, पण आपण काय शिकलो आणि आपण कसे सुधारलो हे महत्त्वाचे आहे. या संघर्षात अण्वस्त्रे वापरण्याची कधीही गरज नव्हती, जी दिलासा देणारी बाब आहे. यापूर्वी 12 मे रोजी एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना विचारण्यात आले होते की राफेल पाकिस्तानमध्ये कोसळले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाडण्यात आले?
पाकिस्तानने 7 मे रोजी 5 भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 7 मे रोजीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला होता की आम्ही भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली, ज्यामध्ये 5 भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. पाच विमानांमध्ये 3 राफेल होते. नंतर पाकिस्तानने 6 भारतीय विमाने पाडल्याचा दावा करायला सुरुवात केली.
काँग्रेसने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली
दरम्यान, काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवरून सीडीएस अनिल चौहान यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत म्हटले की, या निवेदनात, आम्हाला लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचे मान्य करण्यात आले. मग मोदी सरकार हे का लपवत आहे?
सीडीएस चौहान म्हणाले, पाकिस्तानशी चांगल्या संबंधांचे युग समाप्त
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी शांग्री-ला संवाद कार्यक्रमात 'भविष्यातील युद्ध' या विषयावर भाषण दिले. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल ते म्हणाले, 'आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचे युग संपलं आहे.' सीडीएस चौहान यांनी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या शपथविधी समारंभात पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कसे आमंत्रित केले होते याची आठवण करून दिली. ते म्हणाले की दोन्ही हातांनी टाळी वाजवावी लागते, परंतु जर बदल्यात फक्त शत्रुत्व मिळाले तर अंतर राखणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. ते म्हणाले, 'जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सामाजिक विकास, जीडीपी किंवा दरडोई उत्पन्न अशा अनेक बाबींमध्ये पाकिस्तान भारताच्या पुढे होता. आता परिस्थिती बदलली आहे. आता भारत प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानच्या पुढे आहे. हा बदल कोणत्याही योगायोगामुळे नाही तर विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा परिणाम आहे.'
सीडीएसच्या संवादातील 4 महत्त्वाचे मुद्दे
- आता युद्धे पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. आता जमीन, हवा, समुद्र याशिवाय सायबर आणि अवकाश अशा नवीन क्षेत्रात युद्धे लढली जात आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्यात आला.
- पाकिस्तानने चिनी किंवा पाश्चात्य उपग्रह प्रतिमांचा वापर केला असेल, परंतु भारताने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसारख्या स्वतःच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलो. भारताने युद्धासाठी आवश्यक असलेले नेटवर्क आणि रडार प्रणाली स्वतः तयार केली आणि हे आमचे मोठे यश होते.
- आजकाल युद्धात आणखी एक आव्हान आहे, चुकीची माहिती आणि अफवा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील, आपल्या सैनिकांना बनावट बातम्यांना तोंड देण्यासाठी बराच वेळ द्यावा लागला. भारताची रणनीती घाई न करता, ठोस तथ्यांसह आपला दृष्टिकोन मांडण्याची होती.
- ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात, दोन महिला अधिकारी माध्यमांशी बोलत होत्या, कारण त्यावेळी वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये व्यस्त होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















