Wardha : नगर परिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातील पत्रिकेतील प्रोटोकॉल चुकला; खासदार अमर काळेंनी मंचावरच मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब, म्हणाले..
वर्ध्याच्या हिंगणघाट नगर परिषदसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पत्रिकेत खासदार अमर काळे यांचे नाव प्रोटोकॉलनुसार छापण्यात आले नसल्याने त्यांनी मंचावरूनच आपली नाराजी व्यक्त केली.

Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाट नगर परिषदसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा स्वतंत्रदिनी (15 ऑगस्ट रोजी) पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवरून मात्र या लोकार्पण सोहळ्याच्या मंचावर नवा वाद उफाळून आला. पत्रिकेत खासदार अमर काळे यांचे नाव प्रोटोकॉलनुसार छापण्यात आले नसल्याने त्यांनी मंचावरूनच आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय आपल्या भाषनादरम्यान खासदार अमर काळे यांनी जाब विचारत मुख्याधिकाऱ्यांना याबाबत माईकवरच सुनावलं. दरम्यान, खासदार काळेंच्या या प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांना मात्र उत्तर देता आले नाही. त्यामुळे राजकीय दाबावात हा प्रटोकॉल चुकविण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय.
दरम्यान जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय कार्यक्रमादरम्यान खासदार अमर काळे यांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून होतोय. अशातच या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंचे नाव प्रोटोकॉलनुसार छापण्यात न आल्याने यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विचारण्यात येतो आहे.
केळझर येथील बांधकाम विभागाचे विश्रामगृह बनले अवैध धंद्याचा अड्डा
वर्ध्याच्या केळझर येथील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह दुरावस्थेत सापडलंय. सात वर्षांपासून विश्रामगृहाच्या चारही इमारती अवैधधंद्याचा अड्डा बनलाय. या इमारतीतवर आतापर्यत शासनाने केलेला खर्च पाण्यात बुडाल्याचे दिसून येते आहेय. दरम्यान, केळझर हे पर्यटनस्थळ असल्यामुळं इथल्या विश्रामगृहात अधिकारी, लोकप्रतिनिधी, पर्यटक येऊन थांबायचे. परंतु आता विश्रामगृहाची ही पुरातन वास्तू दुरावस्थेत सापडलीय. या इमारतींचा वापर अवैधरित्या व्यवसाय करणारे करतांना दिसत आहे. नवीन इमारतीच्या बांधकामावर लाखोचा खर्च झालाय पण या इमारती मात्र सुरु होण्यापूर्वीच मोडकडीस आल्याय. येथील खिडक्या, दरवाजे, टाईल्स काढून नेण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.
ट्रकसह 25 टन सोयाबीन जळून खाक
सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह 25 टन सोयाबीन जळून खाक झाला आहे. ही घटना यवतमाळच्या मारेगांवच्या बोटोणी गावाजवळ घडली. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. हा ट्रॅक करंजीकडून वणीकडे सोयाबीन घेऊन जात होता. घटनेची माहिती मिळताच करंजी वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पांढरकवडा येथून अग्निशमन दलाच्या वाहनाला बोलवलं. तोपर्यंत मात्र ट्रक आणि त्या मधिल सोयाबीन पूर्णपणे जळून खाक झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा:























