एक्स्प्लोर

घाई करु नका, अजून पेरणीयोग्य पाऊस नाही : कृषी विद्यापीठ

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला समोरं जावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

परभणी : पावसाळा सुरु झाला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु होते. मात्र अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला समोरं जावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. किमान 100 मिली पावसानंतरच पेरणी योग्य मान्सूनपूर्व पावसानंतरच शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलाय. काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला देखील सुरुवात केली आहे. त्यात येणाऱ्या काळात पावसाने उघड दिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी सुरु करु नये, किमान शंभर मिली पाऊस झाल्यावर पेरणीला सुरवात करावी, असा सल्ला विद्यापीठातील शास्त्रज्ञ उद्धवराव आळसे यांनी दिला. पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्याल? शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा किती आहे हे पाहावं, नंतरच सुरवात करावी, वाणाची निवड करुन प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणी अधिक खोल गेल्यास पाऊस जोराचा आला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर पेरणी करताना पिकांची निवड आणि पेरणीचा काळ याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये कमी काळाची पिके सुरवातीला पेरली गेली पाहिजेत. यात मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आहे, तर दीर्घकालीन पिकांमध्ये कापूस, तूर अशी पिके आहेत. ती थोडी उशिरा पेरली तरी चालू शकतात, असंही कृषीतज्ञ सांगतात. जमिनीनुसार पिकांची निवड पेरणी करताना भारी जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात. त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येतं. यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखे पिके घेता येतात. तर हलक्‍या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी, हुलगे अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागतं. त्यामुळे जमिनीनुसार योग्य त्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन केल्यास त्याचा पुढील अनेक दिवस फायदा मिळू शकतो. त्यासाठी योग्य ते नियोजन करत मशागत आणि पेरणी गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रकारानुसार उताराला आडवी पेरणी करावी, तर सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी यातून पडणारं पाणी शेतात मुरायला मदत होते, असा सल्ला कृषीतज्ञांनी दिला आहे. वान निवडताना कोणती काळजी घ्याल? वानांची निवड करताना जमिनीचा प्रकार आणि पाऊस पाणी यांचा विचार करुनच योग्य ते बियाणे खरेदी करावेत. यात कमी कालावधीत आणि मध्यम येणारे बियाणे बाजारात आहेत. योग्य ते मार्गदर्शन घेऊन बियाण्याची निवड केल्यास त्याचा फायदा होतो. पावसाच्या पर्जन्यमानानुसार वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळू शकतो, त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची बियाणी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पेरणी आणि पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन, सोबत जमिनीची निवड आणि बियाण्यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
Pune Lohagad Case : मुलाच्या हत्येनंतर आता वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवालांचं स्टेटस, केतनच्या आजोबांचं निधन
मुलाच्या हत्येनंतर आता वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवालांचं स्टेटस, केतनच्या आजोबांचं निधन

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget