एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'सबका साथ मित्र का विकास', मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray in Dharavi : आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. मात्र, केंद्र सरकार न्यायालयात गेले होते. तुमची जागा की आमची जागा असे सुरु होते. ती जागा आम्हाला नकोय आमच्या लोकांसाठी पाहिजे. नाही ही फक्त आमची जागा असे बोलले जात होते. तिथे मिठागर आहे. कांजूरला पण मिठागर आहे.

Uddhav Thackeray in Dharavi : सबका साथ सबका विकास नाही तर  'सबका साथ मित्र का विकास', असं सध्या सुरु आहे. मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून केला जात आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. ते धारावी येथील सभेत बोलत होते. 

'अडाणींसाठी मुलुंडच्या मिठागरांची जागा देऊन टाकली'

उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. मात्र, केंद्र सरकार न्यायालयात गेले होते. तुमची जागा की आमची जागा असे सुरु होते. ती जागा आम्हाला नकोय आमच्या लोकांसाठी पाहिजे. नाही ही फक्त आमची जागा असे बोलले जात होते. तिथे मिठागर आहे. कांजूरला पण मिठागर आहे. त्यांनी जागा दिली नाही. मी मुख्यमंत्री म्हणून कांजुरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या मित्रासाठी, अदाणींसाठी मुलुंडच्या मिठागरांची जागा देऊन टाकली. हा यांचा सबका साथ आणि सबका विकास आहे. साथ सर्वांची हवी मात्र, विकास माझ्या मित्रांचा होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

कोरोना धारावीत आला तेव्हा दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  माझी धारावीकर येथून कोठेही जाणार नाहीत. धारावीकरांना विकास पाहिजे आणि तो इथल्या इथेच पाहिजे. तुम्हाला हे सोपे वाटत असेल की, घरे बांधेपर्यंत मिठागरात जागा दिली. पण एकदा का तुम्ही मिठागरात गेला की, परत तुम्हाला धारावी दिसणार नाही. ही जागा दुसरे-तिसरे कोणाच्या नाहीतर अडाणींच्या घशात घातली जाणार आहे. म्हणजे धारावी तर गेलीच आणि मिठागर देखील गेले. तुम्ही तिथे किती दिवस राहणार? तुम्हाला सोयी तर काय मिळणार?  सध्याचे उपमुख्यमंत्री , पंतप्रधान कधी तरी तुमच्या भेटीला आलेत का? पण आता दिसतील. आता त्यांना माहिती आहे की, धारावीमध्ये कोरोना नाही. कोरोना काळात काय होते? तेव्हा दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता. तेव्हा म्हणत होते उद्धवजी काहीतरी करा. मी म्हटलं चिंता करु नका. मी सांगत होतो घराबाहेर पडू नका. धारावीत एका घरात 8 -10 लोक राहतात, असेही या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. 

धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे

माझ्या धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. विकास आम्हाला पण पाहिजे. पण तुम्ही इकडी कोंडवडा करुन अडाणीच्या घशात पैसा घालणार आहात. मुंबईतील सर्व उद्योगधंदे ओरबाडून घेऊन जात आहेत. आता त्यांना ते कमी पडतय म्हणून ते अख्खी धारावी ते अडाणीच्या घशात घालायला निघाले आहेत, असा दावाही ठाकरे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Zeeshan Siddique : पक्ष सोडला नाही, पण झिशान सिद्दीकींनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert: मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Horoscope Today 5 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 5 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget