एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडीत तीन महिन्यांपासून आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा बंद, अनधिकृत पाणीपट्टी वसुल करणाऱ्या समितीचा प्रताप

Bhiwandi Water Crisis : भिवंडीतील अनधिकृत ग्राम पाणी पुरवठा समितीकडून आदिवासी वस्तीचे पाणी बंद करण्यात आल्याप्रकरणी संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा,कळशीसह ठिय्या आंदोलन केलं. 

ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आजही या देशातील मूळ पुरुष म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज असंख्य नागरी सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहण्यात येत आहे. अशीच एक घटना भिवंडी तालुक्यात समोर आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपट्टी वसुली करणाऱ्या अनधिकृत ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबीयांचे पाणी तब्बल तीन महिन्यांपासून बंद केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे.

भिवंडी तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी 35 आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या गावत मुंबई महानगरपालिकेच्या पाईप लाईनवरील नळ जोडणीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याचे पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतीच्या नावाने दिले जाते. परंतु गावातील पाणीपट्टी वसुली ही गाव पातळीवरील स्थानिक ग्रामस्थांच्या हातातील ग्राम पाणीपुरवठा समिती करत असल्याने त्यांनी प्रतिमाह 100 रुपये दिले नसल्याचा आरोप करीत थेट या वस्तीतील पाणीपुरवठा खंडित केला आहे.
          
या घटनेची माहिती स्थानिक महिलांनी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार आणि तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांना दिली. त्यांनी या महिलांना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल होत आंदोलन केले. 

मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतीस पाणीपुरवठा केला जातो. परंतु स्थानिक ग्राम पाणीपुरवठा समितीकडून आदिवासी कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. येथील संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि अनधिकृत पाणीपट्टी वसुली करणाऱ्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.

आम्ही कातकरी वारली समाजाचे असल्याने आमच्या वस्तीतील सर्व कुटुंबीय दरमहा पाणीपट्टी जमा करून समितीकडे देतो. पण मागील तीन महिन्यांपासून पाणी देत नसल्याने आम्ही या समितीसह ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही आमची दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थ महिला बेबिबाई खांजोडे यांनी बोलून दाखवली आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
Ambernath Nagar Parishad: अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
Thane Mumbra Crime : प्रेयसीनेच पती आणि भावासोबत मिळून प्रियकराला संपवलं, ड्रममध्ये भरून गटारात फेकलं; पण 'त्या' कटकारस्थानचं सत्य बाहेर आलंच, ठाणे हादरलं!
प्रेयसीनेच पती आणि भावासोबत मिळून प्रियकराला संपवलं, ड्रममध्ये भरून गटारात फेकलं; पण 'त्या' कटकारस्थानचं सत्य बाहेर आलंच, ठाणे हादरलं!
आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला
आनंद परांजपेंच्या गळ्यात भगवा; राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश; म्हणाले, 12 वर्षांचा वनवास संपला

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Embed widget