एक्स्प्लोर

Ambernath : अंबरनाथच्या ग्रामपंचायतीत 'सात महिन्यांचा सरपंच', प्रत्येक सदस्याला संधी मिळावी म्हणून अनोखा पॅटर्न

Ambernath : ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना प्रत्येकी सात महिने सरपंचपद दिलं जातंय. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी मिळतेय.

मुंबई : अंबरनाथच्या (Ambernath) ढोके दापिवली ग्रामपंचायतीत (Dhoke Dapivali gram panchayat) सात महिन्यांच्या सरपंचपदाचा अनोखा पॅटर्न राबवला जातोय. सरपंचपदाच्या (Sarpanch) निवडणुकीत ( Election ) होणारा घोडेबाजार टाळता यावा, तसंच प्रत्येक सदस्याला सरपंचपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी हा पॅटर्न राबवला जातोय.  सध्या राज्यभरात ढोके दापिवली ग्रामपंचायतीच्या पॅटर्नची चर्चा होतेय. 

 ग्रामपंचायत सदस्य आणि त्यातही सरपंचपदाला ग्रामीण भागात मोठा मान असतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस पाहायला मिळते. तर सरपंचपदाची निवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची बनलेली असते. यात अनेकदा घोडेबाजार, वादविवाद होऊन गावातलं वातावरण दूषित होतं. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली आंबेशिव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीनं सात महिन्याच्या सरपंचपदाची शक्कल लढवली आहे. 

या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना प्रत्येकी सात महिने सरपंचपद दिलं जातंय. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी मिळतेय. मागील 14 महिन्यात या ग्रामपंचायतीत तिसऱ्या सरपंच आणि उपसरपंचाची निवड नुकतीच करण्यात आली. या ग्रामपंचायतीत माधुरी रामदास भोईर, नितीन बाळकृष्ण गायकर, जागृती अमोल भोईर, योगेश भालचंद्र भोईर, पूजा सचिन गायकर, रतन रमेश भोपी, श्रीधर बाळाराम भोपी, नीता बळीराम भोपी आणि सरिता गणेश सवार असे एकूण नऊ सदस्य आहेत. यापैकी जागृती अमोल भोईर आणि योगेश भालचंद्र भोईर हे दोन सदस्य यापूर्वी सात-सात महिने सरपंच होऊन गेले आहेत. तर आता माधुरी रामदास भोईर या सरपंच आणि नितीन बाळकृष्ण गायकर हे उपसरपंच बनले आहेत. पुढील सात महिने त्यांचा कार्यकाळ असेल. त्यानंतर पुन्हा नव्या सदस्यांची निवड केली जाईल.
 
देशात पंचायत राज कायद्याने ग्रामपंचायतींचं महत्त्व दाखवून दिलं आहे. त्यात देशात सर्वाधिक मतदान देखील ग्रामपंचायत निवडणुकीत होतं, हेदेखील समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीत होणारी चुरस, राजकीय स्पर्धा आणि वादविवाद टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ढोके दापिवलीचा हा पॅटर्न सगळीकडेच राबवायला हरकत नाही, असं या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मत आहे. 

महत्वाच्या बातम्या

विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण  

Pune Crime News: अंधश्रद्धेचा कहर! मांत्रिकाने पुत्रप्राप्तीसाठी सर्वांसमोर विवाहितेला स्नान करण्यास भाग पाडले; पुण्यातील धक्कादायक घटना 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव
मुसळधार पाऊस, डोक्यावर प्लास्टिक, उघड्यावरच केले अंत्यसंस्कार, स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही मुलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget