एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुका फेसबुक-झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी

भारतातील आगामी लोकसभा निवडणुका हा फेसबुक आणि फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसाठी प्राधान्यक्रमावर असल्याची माहिती फेसबुकच्या पदाधिकारी केटी हरबथ यांनी दिली

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका या फेसबुक आणि मार्क झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी असल्याचा दावा फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स आणि गव्हरमेंट आऊटरिच विभागाच्या संचालक केटी हरबथ यांनी केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीकडे  फेसबुक, भारत सरकार आणि भारतीय मतदार-जनता यांच्यासोबतचे संबंध अधिक व्यापक करण्याची एक नामी संधी म्हणून पाहात आहे. या माध्यमातून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचाही फेसबुकचा प्रयत्न असेल.
सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना, फेसबुकमधील महत्त्वाच्या नियुक्त्या, जाहिरातीचं पारदर्शक धोरण यावर फेसबुकने काम सुरु केलं आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका तसंच बांगलादेश, ब्राझिल आणि अमेरिकेतील निवडणुकांच्या अनुभवातून भारतात काय काय धोरणं राबवायची याचा अभ्यास केला जात आहे.
फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स संचालक केटी हरबथ यांच्या मते भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि सीओओ शेरील सँडबर्ग यांच्यासाठीही टॉप प्रायोरिटी आहेत.
फेसबुकवर प्रत्येक यूजरला त्याच्या प्रोफाईलवर किंवा पेजवर माहिती पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य असतं. फेसबुक नेहमीच या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करत आलंय. मात्र यापूर्वीच्या भारतातील तसंच अन्य देशातील निवडणुकीच्या अनुभवातून असंही लक्षात आलंय की काही यूजर्स चुकीची माहिती पोस्ट करतात. अशी खोटी माहिती अनेकदा हेतूपुरस्सर व्हायरल केली जाते. अशा घातक माहितीचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुक नेहमीच सहकार्य करत आल्याचा दावाही केटी हरबथ यांनी केला.
यापूर्वीच्या बांगलादेश आणि अमेरिकेतील सिनेट निवडणुकीच्या वेळी प्रशासनाने अशा पेजेसबाबत अधिकृत माहिती पुरवली तेव्हा फेसबुकने ते पेज आणि प्रोफाईल हटवले. फक्त प्रशासनच नाही तर सामाजिक दबाव गट, सामाजिक संस्था-संघटना आणि त्रयस्थ संस्था यांच्याकडून फेसबुक अशा उपद्रवी आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या पेजेसबाबत माहिती संकलित करत असतं. अशा सर्वांबरोबरच भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही समन्वय साधला जाणार आहे.
फेसबुकप्रमाणेच फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामच्या बाबतीतही हीच पावलं उचलण्यात येणार आहे. खोट्या आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुक समूह यथाशक्ती प्रयत्न करणार आहे.
भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्राम निवडणूक आयोगासोबत काम करणार आहे. भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक दर्जा असलेली स्वायत्त संस्था आहे. त्यामुळेच भारतीय निवडणुकीत फेसबुक किंवा इंन्स्टाग्रामचा वापर करुन कुणीही खोट्या माहितीचा प्रचार-प्रसार करणार नााही, याकडे कटाक्षाने लक्ष पुरवलं जाणार आहे.
फेसबुक भारतीय निवडणुकांवर ऑक्टोबर 2017 पासूनच काम करत आहे. तेव्हापासून झालेल्या राज्यांच्या विधानसभांच्या  निवडणुकातून फेसबुक नव्याने काही ना काही शिकत आलंय, असंही त्यांनी सांगितलं. वेगवेगळे राजकीय पक्ष तसंच उद्योगांकडून येणाऱ्या जाहिरातींबाबतही फेसबुकने व्यापक धोरण ठरवलंय. लोकांना असलेल्या माहिती जाणून घेण्याचा हक्क आणि त्यांची व्यक्तिगत गोपनियता याचाही फेसबुक आदर करणार आहे.
भारतासारख्या बहुभाषिक देशात काम करण्यासाठी फेसबुकने वेगवेगळ्या भाषांचे जाणकार असलेल्या गटांसोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील मजकुराचा नेमका अर्थ आणि त्याचा प्रभाव याचा माग काढणं सहज शक्य होणार आहे.
राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षांच्या विचारधारेशी साम्य असलेल्या काही त्रयस्थ संस्था त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. काही वृत्तसंस्था तसंच प्रसारमाध्यमेही असा छुपा प्रयत्न करतात. त्याचा माग घेणं भारतात तुलनेनं अवघड आहे.
फेसबुक अजून बऱ्याच गोष्टी शिकत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक निवडणूक ही शिकण्याची एक संधी असते. तसंच आम्ही प्रत्येक वेळी नवं ज्ञान आत्मसात करतोय असं केटी हरबथ यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget