एक्स्प्लोर

Supriya Sule : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून 12 जागा मिळणार?  सुप्रिया सुळे म्हणाल्या....

Supriya Sule : "आमची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा करु. तुम्हाला आठ ते दहा दिवासांत समजेल कोणाला किती जागा मिळणार" असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

Baramati : महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "आमची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा करु. तुम्हाला आठ ते दहा दिवसांत समजेल कोणाला किती जागा मिळणार" असे सुप्रिया सुळे स्पष्ट केले. बारामती येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. "राम हा आस्थेचा विषय आहे. जगभरात रामाचे भक्त आहेत. मात्र, आम्ही राम कृष्ण हरी वाले आहोत", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण आले तरी जाणार नाही. माझी काही आस्थेची ठिकाणे आहेत, तेथेच मी जातो, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केलय. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांचे कौतुक केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे 40 वर्षांपासून चांगले संबंध आहेत. गडकरी यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. 
आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावरही सुळे यांनी भाष्य केले आहे. बच्चू कडू यांनी बंद दाराआड चर्चा केली असेल तर मला याबाबत काही माहिती नाही. आम्ही पुढील रणनिती अपात्रेबाबतचा निर्णय आल्यानंतर ठरवणार आहोत, असेही सुळे म्हणाल्या

नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे दु:ख पीएम मोदींपर्यंत पोहोचेल - सुप्रिया सुळे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांचे स्वागत केले आहे. अतिथी देवो भव त्यांचे आम्ही स्वागत करु. नाशिकमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कांद्या निर्णयाबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांनी कांदा निर्यातीबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे. पीएम मोदींनी कांदा निर्यातीवरिल बंदी उठवावी, अशी मागणीही सुळे यांनी यावेळी केली. शिवाय, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला. 

आम्ही सभा घ्यायच्या की नाही ? 

आमच्या सभांना परवानगी दिली जात नाही. विरोधी पक्षांच्या सभेला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आम्हाला सभा घेताना खूप त्रास होत आहे. या दडपशाही विरोधात आम्ही लढत राहू, अशा इशाराही सुळे यांनी या वेळी दिला. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की, विरोधी पक्षांवर कारवाई सुरु केली आहे. 90 टक्के केसेस विरोधी पक्षावर होतात. प्रियांका गांधींवरही त्याच पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे, असा दावा सुळे यांनी केला. 

जरांगे पाटील लोकशाही मार्गाने लढत आहेत - सुळे 

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Jarange Patil) लोकशाही मार्गाने लढत आहेत. त्यांचा लढा लोकशाही मार्गाने सुरु आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांच्या मुंबईत निघाणाऱ्या मोर्चावर दिली आहे. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी

 

सप्रिया सुळे यांची संपूर्ण मुलाखत 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget