एक्स्प्लोर

गेल्या 24 दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार संपावर

शासन हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना टनभर ऊस तोडायला पाचशे रुपयाच्या जवळपास खर्च करते. मजुरांना मात्र तोडणी करायला 228 रुपये टनाला देतात.

बीड : दसरा जसजसा जवळ येतोय, तसतशी ऊसतोड कामगारांची साखर कारखान्याला जायची लगबग सुरु होते. यावर्षी मात्र हे ऊसतोड कामगार मागच्या 24 दिवसांपासून संपावर आहेत. तरीही या कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चेच्या कोणत्याही हालचाली पाहायाला मिळत नाहीत. एकीकडे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक ऊस शेतात उभा असताना, ऊसतोड कामगार मात्र हाती कोयता घ्यायला तयार नाहीत, म्हणून मोठा पेच निर्माण झाला आहे. आपलं बिर्‍हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त काल भटकंती करणारा समाज म्हणजे ऊसतोड कामगार. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ऊसाच्या फडात राब राब राबणार्‍या या हाताच्या कामातून साखर गोड होते खरी, मात्र या ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू असतो. एकीकडे शासन हार्वेस्टरने ऊसतोडणी करताना टनभर ऊस तोडायला पाचशे रुपयाच्या जवळपास खर्च करते. मजुरांना मात्र तोडणी करायला 228 रुपये टनाला देतात. म्हणून शंभर टक्के दरवाढीची मागणी कामगारांनी केलीय. संपूर्ण राज्यभरात 12 ते 13 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यात सर्वाधिक ऊसतोडणी मजुरांची संख्या बीड जिल्ह्यात आहेत. बीड खालोखाल नगर, उस्मानाबाद ,जालना, औरंगाबाद , जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मजुरांची संख्या अधिक आहे. मुळात ज्या पद्धतीने ऊसतोड कामगारांना काम करावे लागते, त्या तुलनेत कष्टाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांसोबतच ऊस तोडणी मुकादमास साडे 18.5 टक्के कमिशन आहे, ते 35 टक्के करावे, अशी मागणी या आंदोलांकर्त्यांची आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय आहेत? - साल 2014-15 साठी अंतरिम दरवाढीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याची अंमलबजाणी करावी. - ऊस तोडणी दरात 100 टक्के वाढ करावी. - 35 टक्के कमिशन मुकादमास द्यावे सध्या ते18.5 टक्के आहे. - कारखाना साईटवर ऊसतोड मजूर व बैलांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध कराव्यात. - 15 रुपये प्रत्येक दिवशी बैलगाडीच्या टायर गाडीचे भाडे घेण्यात यावे. - 30 रुपये प्रत्येक दिवशी ट्रॅक्टर गाडीचे भाडे घ्यावे. - ऊस तोडणी मजुरांचा जीवन विमा साखर कारखान्यांनी भरावा. - 60 वर्षांच्या पुढील ऊसतोड मजूर मुकादमास पेन्शन मिळावी. - ऊसतोड मजुरांच्या मुलाकरता प्रत्येक तालुक्यात निवासी शाळा आणि वस्तीगृहाची सोय करण्यात यावी. ऊसतोड कामगार मुकादम संघटनांनी ऊस तोडणी कामगारांचा संप हा 19 ऑगस्टपासून पुकारला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या दोघांचा लवाद ऊसतोड कामगरासाठी होती. गोपीनाथ मुंडेंच्या आकाली निधनानंतर पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांची या लवादावर निवड करण्यात आलीय. नुकतीच या लवादाची एक बैठक पुण्यात पार पडली. या पूर्वी 2015 साली ऊसतोड कामगारांनी संप केला होता. मात्र त्यावेळी दुष्काळाचे दिवस असल्याने आणि ऊसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसतोड कामगारांनी तडजोड करुन संप मागे घेतला होता. यावर्षी एकतर ऊसाची उपलब्धताही विक्रमी आहे आणि त्यामुळे यावर्षी साखर कारखान्यांचा हंगाम वाढणार आहे. म्हणूनच वेळेत साखर कारखाने सुरु कारायचे असल्यास ऊसतोड कामगाराच्या संपावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs GT LIVE score IPL 2026 : गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
KKR vs GT LIVE Update : गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, कोलकाताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, रहाणेची प्रतिष्ठेची लढाई, कोण जिंकणार?
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget