एक्स्प्लोर

नोकरी सोडली, कोंबड्या पाळल्या, कुक्कुटपालनातून 5 कोटींची उलाढाल

अंकुश कानडे हे नेवासा तालुक्यातील आंतरवाली इथले रहिवासी. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून 20 वर्षापूर्वी देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरु केला. अवघ्या 22 कोंबड्यांपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं आहे.

अहमदनगर: आयुष्यभर नोकरीत अडकून न राहता, स्वत:चा व्यवसाय सुरु करुन, वर्षाला तब्बल 5 कोटींची उलाढाल करणाऱ्या अंकुश कानडे यांची ही यशोगाथा. अंकुश कानडे हे नेवासा तालुक्यातील आंतरवाली इथले रहिवासी. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून 20 वर्षापूर्वी देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरु केला.  अवघ्या 22 कोंबड्यांपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं आहे. अंकुश कानडे यांचा हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची पैदास करणारा राज्यातील मोठा व्यवसाय ठरला आहे. कानडे यांनी आर्थिक नियोजन करत ब्रिडींग फार्म, अंडी आणि चिकन अशा विविध अंगाने व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत पोहोचली आहे. अंकुश कानडे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत होते. मात्र त्यांना उद्योग-व्यवसाय खुणावत होता. त्यांनी 1997 मध्ये ब्रॉयर कोंबडीपासून कुक्कुटपालनाला सुरुवात केली. पण आर्थिक गणित न जुळल्याने तो व्यवसाय थांबवला. त्यानंतर आंतरवालीपासून जवळ कुकाणा येथील बाजारातून सुमारे दोन हजार देशी कोंबड्यांचे पालन सुरु केले. चार महिन्यांचे संगोपन करण्यासाठी प्रति कोंबडीला 35 रुपये खर्च आला. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर व्यवसाय वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाराष्ट्रातील देशी कोंबडी आणि दक्षिणेतील देळशी कोंबडी यांचं ब्रीड तयार करुन त्यांनी नव्या संशोधनाची कास धरली. देशी कोंबडीची अस्सल चव असलेल्या चैतन्य गावरान क्रास हा ब्रँड त्यांनी उदयास आणला. आज संपूर्ण राज्यभर त्याची मागणी होत आहे. नोकरी सोडली, कोंबड्या पाळल्या, कुक्कुटपालनातून 5 कोटींची उलाढाल कसा उभारला उद्योग? कानडे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरुवातीला दोन लाख रुपये खर्च करुन तीन हजार चौरस फुटांचे शेड उभे केले. त्यांनी अंडी उबवणारी यंत्रणा सुरु करण्याचं ठरवलं. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च करुन या यंत्राची दिल्लीहून खरेदी केली. त्यानंतर जिल्हाभरातील बाजारातून देशी अंडी खरेदी केली. तीन हजार पिल्लांचे संगोपन सुरु केले. प्रत्येक पक्षाला 50 रुपये याप्रमाणे दीड लाख रुपये खर्च झाला. मुंबईत कोंबड्यांची विक्री केली. प्रति पक्षाला 81 रुपये मिळाले. त्यातून एक लाख रुपयाचा नफा मिळाला. वर्षभरात तीन वेळा प्रत्येकी तीन हजार कोंबड्यांचे पालन केले. त्यातून जवळपास तीन लाख रुपये नफा मिळाला. मिळालेल्या नफ्यातून नियोजनबद्ध गुंतवणूक केली. मुलगा संतोष यांनीही व्यवसायाची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उचलली आहे. बीएससी अॅग्री आणि एमबीए मार्केटिंग केलेल्या संतोष कानडे यांनी या व्यवसायाला व्यवसायिक स्वरुप दिलं. व्यवसायाची भरभराट आंतरवाली येथे अंडी उबवणी आणि देशी कोंबडी पालनातून दोन वर्षात बऱ्यापैकी भरभराट झाली. स्वतःच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पिल्लांसह इतरांसाठीही अंडी उबवून पिले तयार करुन देण्याचे काम सुरु केले. महिन्याला साधारण 12 हजार पिल्लांचे उत्पादन आणि महिन्याला 50 हजार रुपये उत्पन्न मिळू लागले. देशी पक्षांना मागणी वाढली. प्रती पिलासाठी 4 रुपये खर्च येत असताना 8 रुपये मिळू लागले. देशी पिलांना मागणी वाढू लागली. परदेशी कंपनीसोबत कामाला सुरुवात 2006 मध्ये थायलंडच्या एका परदेशी कंपनीमुळे व्यवसायाला बळकटी मिळाली. त्या कंपनीला दर महिन्याला साधारण चार लाख अंडी उबवून हवी होती. तशी क्षमता असलेले यंत्र खरेदी करण्यासाठी कंपनीने 10  लाखांची आगाऊ रक्कम दिली. मग कानडे यांनी अंडी उबवणीचे 16 लाख रुपयांचे तिसरे युनिट खरेदी केले. चार वर्षे संबंधित कंपनीसोबत काम केल्याने व्यवसायाला चांगली बळकटी मिळाली.  देशी पिल्‍लांच्या उत्पादनाचा सर्वात मोठा उद्योग देशी कोंबडीला मोठी मागणी आहे. मिळणारा दर आणि त्यासाठी लागणारा खर्च यांचा विचार केला तर या पक्षांतून पैसे अधिक मिळतात असे कानडे सांगतात. देशी पिल्लांची पैदास करणारा त्यांचा राज्यातील मोठा उद्योग आहे. दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील कोंबडीचा संकर करून चैतन्य हा कोंबडीचा वाण त्यांनी विकसित केला आहे. ही कोंबडी कधीच तोट्यात विकावी लागली नाही हा वीस वर्षांतील अनुभव असल्याचे कानडे  सांगतात. कानडे यांचा पोल्ट्री व्यवसाय नऊ ब्रिडींग फार्मस - त्यात साडेतीन ते चार लाख अंडी उत्पादन - प्रति महिना कोंबडी पालन : 6 हजार व्यावसायिक पोल्ट्रीचे सात शेडस पक्षांची संख्या सुमारे 40 हजार दररोज अंडी उत्पादन सुमारे 20 हजार वार्षिक उलाढाल - सुमारे पाच कोटी रु. अंडी आणि चिकन असा व्यवसायाचा दुहेरी हेतू               शेतीपूरक व्यवसाय गरजेचा आज पारंपरिक शेतीचे दिवस राहिले नसून नवनवीन तंत्रज्ञान शेतीत आले आहेत. त्याचा उपयोग करतानाच आपली आर्थिक पत  शेतकऱ्याने वाढवणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करणे आज काळाची गरज आहे, असं अंकुश कानडे यांनी सांगितलं. VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Embed widget