एक्स्प्लोर

... तर स्वत: पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार : बच्चू कडू

मुंबई : नाफेडच्या केंद्रांवर 48 तासात तूर खरेदी सुरु न झाल्यास मी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून सहकार आणि पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. तूर खरेदीची मुदत संपल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने तूर खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सर्व तहान-भूक विसरुन 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सरकारी तूर खरेदी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांबाहेर पाच ते सात किमीच्या ट्रॉलीच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. बाजार समित्यांचं सरकारला पत्र महाराष्ट्रात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत. व्यापाऱ्यांकडून तूर तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जाते. सरकारी तूर केंद्रांवर शेतकऱ्यांकडून तुरीला 5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. मात्र सरकारने तूर खरेदी करण्यासाठी ठेवलेली मुदत 22 एप्रिल रोजी संपली. मात्र त्यानंतरही तुरीची आवक सुरुच आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. आज ना उद्या तूर खरेदीचा निर्णय होईल, या आशेने शेतकरी एवढ्या उन्हात रांगेत बसून आहे. बाजारात आणलेली तूर पुन्हा घराकडे नेऊन, निर्णय झाल्यानंतर बाजारात आणणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही, त्यामुळे तूर खरेदीचा निर्णय होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करु, असं आश्वासन देणारं सरकार आपला शब्द पाळतं का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. औरंगाबादमध्ये तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्याला चक्कर सरकारने तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका 75 वर्षीय शेतकऱ्याला तूर खरेदी केंद्रावर चक्कर आली. खाली पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. सोनवाडी येथील शेतकरी रंगनाथ आल्हाट मागील आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी पैठण येथील केंद्रावर बसून होते. त्यांना उन्हाचा चटका बसून चक्कर आली. त्यामुळे त्यांचा पाय कंबर आणि मांडी यांच्यामध्ये मोडला आहे. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे. रंगनाथ आल्हाट यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 50 हजार रूपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र तूर विकली तरीही 28 हजार रुपयेच मिळतील, त्यामुळे उपचारासाठी बाकीचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित बातम्या :

22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री

कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री?

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले
भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले
Amruta Fadnavis and Manoj Jarange Patil: आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
ABP Majha Top 10, 12 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 12 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Amruta Fadnavis and Manoj Jarange Patil: आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीस जरांगेंबाबत म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते....'
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
Embed widget