एक्स्प्लोर

Solapur News : उजनी धरण आज मायनसमध्ये जाणार, सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली!

Solapur News : उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

Solapur News : उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण (Ujani Dam) आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर (Solapur) जिल्ह्याची चिंता वाढणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 37 दिवस आधी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यातच यंदा पाऊस काळ कमी असल्याचे हवामान खाते सांगत असताना उजनी झपाट्याने कमी होत चालल्याने पुन्हा दुष्काळाची (Drought) टांगती तलवार सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर राहणार आहे.

सध्या कालवा समितीच्या पाणी वाटप निर्णयानुसार कालवा, सिना माढा बोगदा आणि दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी सोडणे सुरु आहे.  गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने 12 जूनला उजनी धरण वजा पातळीत गेले होते. यंदा मात्र तब्बल 37 दिवस आधीच धरण वजा पातळीत जात असल्याने शासनाच्या कालवा पाणी वाटप समितीने काळजीपूर्वक उर्वरित पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

पाण्याची मागणी वाढली

यंदा परतीच्या पावसाऐवजी अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने बळीराजा अडचणीत आहे. यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उन्हामुळे दर महिन्याला उजनी धरणातील 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील वर्षी 15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 59 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या उन्हाळी पाणी पाळी सुरु असून ती 20 मे पर्यंत चालणार आहे. या उन्हाळी पाणी पाळीसाठी 6 टीएमसी पाणी लागणार असून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून 6 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. अजूनही दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी देणे सुरु आहे. यातच आषाढी यात्रेसाठी जूनमध्ये उजनी धरणातून पुन्हा पाणी सोडावे लागणार आहे. अशा आणीबाणीच्या वेळी काही दिवसापूर्वी पाटकूल येथे उजनी उजवा कालवा फुटला होता तर त्यानंतर संगमजवळ जलसेतू देखील फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. 

पाण्याची काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज

ही आकडेवारी पाहता यंदा या उन्हाळ्यात म्हणजे 30 जून अखेर धरण वजा 35 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. उजनी धरणाच्या वजा साठ्यात 63 टीएमसी एवढा पाणी साठा असला तरी यात 10 ते 12 टक्के गाळ असल्याने तेवढा पाणी साठा केवळ कागदावर आहे. त्यामुळे आता पाण्याचे काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर केल्यास पाऊसकाळ लांबला तरी दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात सोसाव्या लागतील. 

...म्हणून पाणी लवकर संपले

गेल्या वर्षी पाऊस काळ संपल्यावरही पडलेल्या पावसाने तब्बल 4 टीएमसी पाणी धरणात जमा झाल्याने 12 जून रोजी धरण मायनस पातळीत गेले होते. याचबरोबर सोलापूर महापालिकेसह, सर्वच पाणी पाळ्या यंदा एक महिना लवकर द्याव्या लागल्यानेही पाणी लवकर संपले आहे. आता उजनी कालवा सल्लागार समितीने तातडीने पाणी नियोजनाची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Patil : माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...
माढ्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण, अंजनगावातील वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला; म्हणाले, स्थलांतर एकमतानंतरच...
Solapur Anjangaon: अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
अंजनगावातील पुतळ्याबाबत अखेर तोडगा निघाला, खेलोबा मंदिराच्या पुजाऱ्यांचे आंदोलन मागे, तणाव निवळला
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Embed widget