एक्स्प्लोर

Solapur News : उजनी धरण आज मायनसमध्ये जाणार, सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली!

Solapur News : उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

Solapur News : उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण (Ujani Dam) आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर (Solapur) जिल्ह्याची चिंता वाढणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 37 दिवस आधी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यातच यंदा पाऊस काळ कमी असल्याचे हवामान खाते सांगत असताना उजनी झपाट्याने कमी होत चालल्याने पुन्हा दुष्काळाची (Drought) टांगती तलवार सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर राहणार आहे.

सध्या कालवा समितीच्या पाणी वाटप निर्णयानुसार कालवा, सिना माढा बोगदा आणि दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी सोडणे सुरु आहे.  गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने 12 जूनला उजनी धरण वजा पातळीत गेले होते. यंदा मात्र तब्बल 37 दिवस आधीच धरण वजा पातळीत जात असल्याने शासनाच्या कालवा पाणी वाटप समितीने काळजीपूर्वक उर्वरित पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

पाण्याची मागणी वाढली

यंदा परतीच्या पावसाऐवजी अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने बळीराजा अडचणीत आहे. यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उन्हामुळे दर महिन्याला उजनी धरणातील 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील वर्षी 15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 59 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या उन्हाळी पाणी पाळी सुरु असून ती 20 मे पर्यंत चालणार आहे. या उन्हाळी पाणी पाळीसाठी 6 टीएमसी पाणी लागणार असून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून 6 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. अजूनही दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी देणे सुरु आहे. यातच आषाढी यात्रेसाठी जूनमध्ये उजनी धरणातून पुन्हा पाणी सोडावे लागणार आहे. अशा आणीबाणीच्या वेळी काही दिवसापूर्वी पाटकूल येथे उजनी उजवा कालवा फुटला होता तर त्यानंतर संगमजवळ जलसेतू देखील फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. 

पाण्याची काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज

ही आकडेवारी पाहता यंदा या उन्हाळ्यात म्हणजे 30 जून अखेर धरण वजा 35 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. उजनी धरणाच्या वजा साठ्यात 63 टीएमसी एवढा पाणी साठा असला तरी यात 10 ते 12 टक्के गाळ असल्याने तेवढा पाणी साठा केवळ कागदावर आहे. त्यामुळे आता पाण्याचे काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर केल्यास पाऊसकाळ लांबला तरी दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात सोसाव्या लागतील. 

...म्हणून पाणी लवकर संपले

गेल्या वर्षी पाऊस काळ संपल्यावरही पडलेल्या पावसाने तब्बल 4 टीएमसी पाणी धरणात जमा झाल्याने 12 जून रोजी धरण मायनस पातळीत गेले होते. याचबरोबर सोलापूर महापालिकेसह, सर्वच पाणी पाळ्या यंदा एक महिना लवकर द्याव्या लागल्यानेही पाणी लवकर संपले आहे. आता उजनी कालवा सल्लागार समितीने तातडीने पाणी नियोजनाची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
Vidhanparishad Election : सोलापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल, भाजपची ताकद असतानाही शिंदे सेनेचा नेता निवडणूक लढवणार?
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: रोहिणी पाराध्येनं स्वतःच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात आयुष्य संपवलं; सासऱ्यांनी त्या दिवशी काय-काय घडलं, सगळं सांगितलं...
रोहिणी पाराध्येनं स्वतःच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात आयुष्य संपवलं; सासऱ्यांनी त्या दिवशी काय-काय घडलं, सगळं सांगितलं...

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget