एक्स्प्लोर

Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला.

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते आज सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचं लोकार्पण होत असून सोलापुरातून मुंबईसाठी पहिलं प्रवासी विमान उड्डाण करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात (Solapur) कार्यक्रमाचे आयोन करण्यात आले होते. त्यामध्ये, जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी न्याय द्या न्याय द्या अशी घोषणाबाजी करत एक व्यक्ती कार्यक्रमात घुसला होता. त्यावेळी, पोलिसांनी (Police) संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून आपल्या बहिणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आई आणि मुलगा दोघेही कार्यक्रमस्थळी येऊन न्यायाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला. त्यावेळी, पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेत बाहेर काढलं. मात्र, या तरुणासोबत त्याची आई देखील न्यायाची मागणी करण्यासाठी आल्याचं दिसून आले. पोलिसांनी माय-लेकास पोलीस जीपमध्ये घालून ठाण्यात नेले.

दरम्यान, पंकज मारुती जिंदम असे कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या आईसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता. पंकज याच्या बहिणीचा 15 ऑगस्ट 2025 रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांच्या नोंद नुसार ही आत्महत्या असल्याचे नमूद आहे. मात्र, सासरच्या मंडळीने छळ करुन हत्या केल्याचा आरोप तरुणाचा आणि त्याच्या आईचा आहे. त्यामुळे, आपल्याला न्याय मिळाव, याचं मागणीसाठी हा तरुण हा मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे दाद मागण्यासाठी, भेटीसाठी आला होता. मात्र, तिथपर्यंत पोहोचता येत नसल्याचे लक्षात येताच त्याने न्याय द्या, न्याय द्या.. अशी घोषणाबाजी केली.

बहि‍णींना दिवाळीची भाऊबीज देण्याचं काम केलं - पालकमंत्री गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात म्हटले की, विरोधक म्हणायचे, गॅरेंटीने विमानसेवा सुरू होणार नाही. पण, गँरंटी देऊन विमानसेवा सुरु करणारा, शहराचा विकास करणारा मुख्यमंत्री आज आहे. सोलापूरवर मोठं संकट उभं राहिलं, अतिवृष्टी-पूर सगळं नुकसान करून गेलं. इतक्या मोठ्या संकटात आपल्या प्रशासनाने आपल्या नेतृत्वात काम केलं. पण या भयानक परिस्थितीत पुरामुळे एकही व्यक्ती दगावाला नाही, याचं आम्हाला समाधान आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटलं. शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे, काही विरोधकांनी दोन तासात पाहणी दौरा केला. 10 हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी या विरोधकांनी केली. पण, तुम्ही 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. आम्ही सरकार म्हणून पूरग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. प्रशासनाच्यावतीने आम्ही दिवाळी सुखाची जावी, यासाठी आम्ही दिवाळी गोड करण्यासाठी आमच्या बहिणींना दिवाळीच भाऊबीज देण्याचे काम केल्याचंही जयकुमार गोरे यांनी म्हटलं.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
तारा भवाळकरांनी मंचावर मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA Candidates list Mumbai: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील 45 उमेदवारांची फायनल यादी, वाचा एका क्लिकवर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
कोल्हापुरात बहुरंगी लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस ठाकरे गट थेट महामुकाबला; इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव शाहू आघाडी
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
तारा भवाळकरांनी मंचावर मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Satej Patil: तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
तर 2 लाख 70 हजारांनी कार्यक्रम झाला नसता; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, मुश्रीफांचा उल्लेख करत राजेश क्षीरसागरांना सुद्धा खोचक टोला
Pimpri Chinchwad MahanagarPalika Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 443 उमेदवारांची माघार, कोणत्या भागातून किती उमेदवार रिंगणात?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत 443 उमेदवारांची माघार, कोणत्या भागातून किती उमेदवार रिंगणात?
Sachin Pilgaonkar On Trollers: 'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, आढेवेढे न घेता, जे काय ते सांगून टाकलं
'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, आढेवेढे न घेता, जे काय ते सांगून टाकलं
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
पश्चिम बंगालमधील 'बिनविरोध' पायंड्यावर तेव्हा भाजप म्हणाला, ही लोकशाहीची हत्या, दहशतीचं वातावरण! कोर्टाचा दरवाजा सुद्धा ठोठावला, निवडणुकीतही टीकेचा मुद्दा
Vasai Virar Mahanagarpalika Election 2026: मोठी बातमी : ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज मागे, आता 89 जागांवरच लढावं लागणार, वसई-विरारमध्ये मोठा धक्का
Embed widget