एक्स्प्लोर

Video: न्याय द्या, न्याय द्या... मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सोलापुरात तरुणाचा गोंधळ; लेकीसाठी आईच्याही डोळ्यात अश्रू

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला.

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते आज सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचं लोकार्पण होत असून सोलापुरातून मुंबईसाठी पहिलं प्रवासी विमान उड्डाण करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात (Solapur) कार्यक्रमाचे आयोन करण्यात आले होते. त्यामध्ये, जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी न्याय द्या न्याय द्या अशी घोषणाबाजी करत एक व्यक्ती कार्यक्रमात घुसला होता. त्यावेळी, पोलिसांनी (Police) संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून आपल्या बहिणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आई आणि मुलगा दोघेही कार्यक्रमस्थळी येऊन न्यायाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं भाषण सुरू असताना अचाकन एक तरुण, मला न्याय द्या, न्याय द्या.. असे म्हणत कार्यक्रमात घोषणाबाजी करताना दिसून आला. त्यावेळी, पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेत बाहेर काढलं. मात्र, या तरुणासोबत त्याची आई देखील न्यायाची मागणी करण्यासाठी आल्याचं दिसून आले. पोलिसांनी माय-लेकास पोलीस जीपमध्ये घालून ठाण्यात नेले.

दरम्यान, पंकज मारुती जिंदम असे कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या आईसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता. पंकज याच्या बहिणीचा 15 ऑगस्ट 2025 रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांच्या नोंद नुसार ही आत्महत्या असल्याचे नमूद आहे. मात्र, सासरच्या मंडळीने छळ करुन हत्या केल्याचा आरोप तरुणाचा आणि त्याच्या आईचा आहे. त्यामुळे, आपल्याला न्याय मिळाव, याचं मागणीसाठी हा तरुण हा मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे दाद मागण्यासाठी, भेटीसाठी आला होता. मात्र, तिथपर्यंत पोहोचता येत नसल्याचे लक्षात येताच त्याने न्याय द्या, न्याय द्या.. अशी घोषणाबाजी केली.

बहि‍णींना दिवाळीची भाऊबीज देण्याचं काम केलं - पालकमंत्री गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात म्हटले की, विरोधक म्हणायचे, गॅरेंटीने विमानसेवा सुरू होणार नाही. पण, गँरंटी देऊन विमानसेवा सुरु करणारा, शहराचा विकास करणारा मुख्यमंत्री आज आहे. सोलापूरवर मोठं संकट उभं राहिलं, अतिवृष्टी-पूर सगळं नुकसान करून गेलं. इतक्या मोठ्या संकटात आपल्या प्रशासनाने आपल्या नेतृत्वात काम केलं. पण या भयानक परिस्थितीत पुरामुळे एकही व्यक्ती दगावाला नाही, याचं आम्हाला समाधान आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटलं. शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे, काही विरोधकांनी दोन तासात पाहणी दौरा केला. 10 हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी या विरोधकांनी केली. पण, तुम्ही 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. आम्ही सरकार म्हणून पूरग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. प्रशासनाच्यावतीने आम्ही दिवाळी सुखाची जावी, यासाठी आम्ही दिवाळी गोड करण्यासाठी आमच्या बहिणींना दिवाळीच भाऊबीज देण्याचे काम केल्याचंही जयकुमार गोरे यांनी म्हटलं.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget